शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 07:31 IST

नेतृत्वाविना श्रीमती सोनिया गांधी यांनी कॉँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतरही पक्षाच्या यशाची उंची काही वाढत नव्हती.

वसंत भोसले

नेतृत्वाविना श्रीमती सोनिया गांधी यांनी कॉँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतरही पक्षाच्या यशाची उंची काही वाढत नव्हती. सन १९९९ मध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा (११४) मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपसह सर्व विरोधी पक्षांना आता पुढील काही दशके आपलीच आहेत, परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सोनिया गांधी यांना स्वीकारलेच जाणार नाही, असे वाटू लागले होते. सन २००४ च्या निवडणुकीत आज अनपेक्षितरीत्या पराभव झाल्यावर भाजपने हा परकीय नागरिकत्वाचा मुद्दा लावून धरला. त्या पार्श्वभूमीवर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे की न स्वीकारावे याचा बराच खल चालू होता. कॉँग्रेस १४५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. डाव्या आघाडीला ६0 जागा मिळाल्या होत्या शिवाय इतर अनेक पक्षांनी कॉँग्रेसने स्थापन केलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीला पाठिंबा दिला होता. कॉँग्रेस पक्षाने संसदीय नेतेपदी श्रीमती सोनिया गांधी यांची निवड केली. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भेट घेऊन काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावाही केला. मात्र, नेतेपद स्वीकारण्यास सोनिया गांधींनी नकार दिला. कॉँग्रेसच्या संसदीय पक्षाची संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक भरली आणि त्यात अचानकपणे माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव सोनिया गांधी यांनी सुचविले. त्यास सर्वांची अनुमती आहे, असेच त्यांनी जाहीर करून टाकले. त्या म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत माझा अंतरात्मा सांगत आहे की, आपण पंतप्रधानपद स्वीकारू नये आणि त्या पदासाठी योग्य व्यक्ती डॉ. मनमोहन सिंग आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात आताच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाट या गावी डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म दि. २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात आले. आॅक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राची डॉक्टरेट केल्यानंतर १९६६-६९ या काळात त्यांनी संयुक्त राष्टÑसंघात काम केले. तत्कालीन वाणिज्य व उद्योगमंत्री ललितनारायण मिश्रा यांनी त्यांना आपल्या मंत्रालयात सल्लागार म्हणून निवडले. त्यांची सरकारी नोकरी सुरू झाली. पुढे १९७० व ८० च्या दशकात त्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. ते सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागारही होते. रिझर्व्ह बॅँकेचे गर्व्हनर म्हणूनही त्यांनी १९८२ ते ८५ मध्ये काम केले. त्यानंतर दोन वर्षे ते नियोजन आयोगाचे प्रमुख होते. त्यांच्या जीवनाला १९९१ मध्ये कलाटणी मिळाली. देशाची आर्थिक स्थिती हलाखीची असताना पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले होते. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रिपदासाठी निवड केली. सलग पाच वर्षे पदावर असताना देशाला त्यांनीनव्या आर्थिक धोरणांची दिशा दिली. आर्थिक उदारीकरण व खुलेपणा त्यांनी आणला. त्यावर खूप टीका झाली, तरी ते मागे हटले नाहीत. परिणामी देशाची आर्थिक प्रगती होण्यास मदत झाली. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात आर्थिक गाडी रुळावर आली.नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कॉँग्रेसचे सरकार आले नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना (१९९८ ते २००४) डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी केली. ‘शायनिंग इंडिया’चा नारा या काळात भाजपने दिला. मात्र, तो पुरेसा नाही, याची खात्री डॉ. मनमोहन सिंग यांना होती. भाजपच्या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी त्यांचे नाव सुचविल्याने देशाचे नेतृत्व करण्याची संधी या अर्थशास्त्रज्ञाला मिळाली. पुढे दहा वर्षे ते या पदावर राहिले.भाजप आघाडीचा पराभव झाल्याने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील संपुआला सरकार स्थापण्याची संधी आली. भाजपने सोनियांच्या परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावर रान उठवूनही तो टिकला नाही, पण त्यांनी पंतप्रधानपद नाकारून अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची निवड केली.

उद्याच्या अंकात ।सिंग इज किंग...!

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधी