शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

सोनिया, राहुल गांधी जामीन घेणार नाहीत !

By admin | Updated: December 16, 2015 02:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू अधिकारी राजेंद्र कुमार यांच्यावरील छाप्याने मंगळवारी संसद दणाणली. मोदी सरकारने सध्या आत्मघाती गोलची (सेल्फ गोल) मालिकाच

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू अधिकारी राजेंद्र कुमार यांच्यावरील छाप्याने मंगळवारी संसद दणाणली. मोदी सरकारने सध्या आत्मघाती गोलची (सेल्फ गोल) मालिकाच चालविल्याचे मानले जाते. दुसरीकडे नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामीन न मिळवता हा निर्णय कोर्टावर सोपवणार असल्याने मोदी सरकारभोवती आणखी एक वादळ घोंघावत असल्याची चिन्हे आहेत.सीबीआयने जवळजवळ पाच वर्षे जुन्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर छापा मारून आणखी एक संधी मिळवून दिल्याने विरोधक आनंदात आहेत. मोदींच्या अखत्यारितीतील सीबीआयने १८ महिने प्रतीक्षा केली. २३ डिसेंबर रोजी संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत आणखी वाट बघता आली असती. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे आणि जीएसटी विधेयक पारित व्हावे यासाठी उत्सुक असलेल्या सरकारचे ‘टायमिंग’ चुकलेच म्हणावे लागेल. भाजपचे नेते काँग्रेसच्या मनधरणीसाठी मागे फिरत असताना अधिवेशनील वादंगात मात्र एक-दुसऱ्या कारणांवरून भरच घालत आहे. पंजाबमध्ये दोन दलित युवकांचे दारू कंत्राटदाराने हातपाय छाटल्याच्या मुद्यावरून सोमवारी संसदेत कामकाज होऊ शकले नाही. राजधानीत थंडीची लाट असताना रेल्वेने ५०० झोपड्या पाडत अनेकांना बेघर केले, हा मुद्दाही विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत देणारा ठरला. उच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे केंद्रावर मूग गिळण्याची पाळी आली.या आठवड्यातही संसद ठप्पच राहण्याची शक्यता आहे. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांना शनिवारी दिल्ली न्यायालयाने हजर राहण्यास बजावले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी हा क्षण ऐतिहासिक बनविण्याची तयारी चालविली आहे. हे दोन्ही नेते जामीन न मिळवता हा निर्णय न्यायाधीशांच्या शहाणपणावर सोपवणार असे संकेत मिळाले आहेत. इंदिरा गांधींच्या कारावासाला उजाळा !१९७८ मध्ये इंदिरा गांधी यांनी जामीन न मिळवता कारागृहात जाणेच पसंत करीत संधीचे सोने केले होते, या आठवणींना धवन यांनी उजाळा दिला असे समजते. सोनिया आणि राहुल गांधी यांचा १० जनपथहून न्यायालयाकडे निघताना तोच मनसुबा राहू शकतो. न्यायाधीशांनी या दोघांना कारागृहात पाठविल्यास तो निर्णय गांधींसाठी लाभदायकच ठरू शकतो. कोणताही जामीन न मिळवता न्यायालयाने त्यांना घरी जाऊ दिल्यास तो सुद्धा त्यांचा राजकीय विजय ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला संपूर्ण आठवडाभर अधिवेशन चालू द्यायचे नाही. २१ डिसेंबरनंतरच संसदेतील वातावरण पूर्ववत होऊ शकेल मात्र सरकारच्या कोणत्या संस्थांनी आणखी आत्मघाती गोलची नोंद केली नाही तरच ते शक्य आहे.