शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

NDA सरकारमुळे देशासमोर संकटे उभी -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:17 IST

देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : देश आज भयावह आर्थिक संकट, भयंकर महामारी आणि आता चीनशी सीमेवर मोठ्या संकटाला तोंड देत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही संकटे उभी ठाकली आहेत. देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.व्हिडिओद्वारा पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला त्या मार्गदर्शन करीत होत्या. सोनिया गांधी म्हणाल्या, देशासमोरील आर्थिक परिस्थिती आधीच्या अपेक्षेत आणखी गंभीर बनली आहे. मोदी सरकार प्रत्येक सूचनेकडे दुर्लक्ष करते आहे. सरकारी तिजोरीतून गरिबांच्या थेट हातात पैसे दिले जावेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण करून त्यांचे पोषण करणे याला सरकारचे प्राधान्य हवे; परंतु सरकारने पोकळ पॅकेज जाहीर केले. त्यात सकल देशी उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षाही कमी राजकोषीय प्रोत्साहन होते, असेही त्या म्हणाल्या.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले की,आपल्या सैनिकांनी ज्यासाठी बलिदान केले, ती परिस्थिती पंतप्रधानांनी स्वीकारली. चीनकडून जी आगळीक झाली ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे गांधी म्हणाले.>आर्थिक परिस्थिती सावरण्यास लागणार मोठा काळआज भारताची ढासळती अर्थव्यवस्था ४२ वर्षांत प्रथमच तेजीकडून मंदीकडे घसरत चालली आहे. मला भीती वाटते की, यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल, नागरिकांचे उत्पन्न घटेल, मजुरी कमी होऊन गुंतवणूक खाली येईल.याचा परिणाम देशाला त्यातून बाहेर पडायला फार मोठा काळ लागेल. हेसुद्धा सरकार व्यवस्था ठीक करील आणि ठोस आर्थिक धोरण राबवेल तेव्हाच शक्य आहे, असा इशारा गांधी यांनी दिला.सरकारला पूर्ण पाठिंबा दिल्यानंतरही ते लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करण्यास तयार नाही. कोट्यवधी स्थलांतरित मजदूर, रोेजंदारीवरील लोकांसह अनेकांचा रोजगार गेला, असे त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले की, ‘सरकारने पूर्ण धाडसाने महामारीला तोंड दिले नाही. चीनला सीमेवर तोंड देण्यात सरकारचा कमकुवतपणा दिसला. आम्ही पूर्ण शक्तीनिशी ते संकट निपटून काढणे गरजेचे होते. आमचा हा दुबळेपणा गंभीर संकटाचे कारण ठरेल.’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधी