शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

NDA सरकारमुळे देशासमोर संकटे उभी -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:17 IST

देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : देश आज भयावह आर्थिक संकट, भयंकर महामारी आणि आता चीनशी सीमेवर मोठ्या संकटाला तोंड देत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही संकटे उभी ठाकली आहेत. देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.व्हिडिओद्वारा पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला त्या मार्गदर्शन करीत होत्या. सोनिया गांधी म्हणाल्या, देशासमोरील आर्थिक परिस्थिती आधीच्या अपेक्षेत आणखी गंभीर बनली आहे. मोदी सरकार प्रत्येक सूचनेकडे दुर्लक्ष करते आहे. सरकारी तिजोरीतून गरिबांच्या थेट हातात पैसे दिले जावेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण करून त्यांचे पोषण करणे याला सरकारचे प्राधान्य हवे; परंतु सरकारने पोकळ पॅकेज जाहीर केले. त्यात सकल देशी उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षाही कमी राजकोषीय प्रोत्साहन होते, असेही त्या म्हणाल्या.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले की,आपल्या सैनिकांनी ज्यासाठी बलिदान केले, ती परिस्थिती पंतप्रधानांनी स्वीकारली. चीनकडून जी आगळीक झाली ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे गांधी म्हणाले.>आर्थिक परिस्थिती सावरण्यास लागणार मोठा काळआज भारताची ढासळती अर्थव्यवस्था ४२ वर्षांत प्रथमच तेजीकडून मंदीकडे घसरत चालली आहे. मला भीती वाटते की, यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल, नागरिकांचे उत्पन्न घटेल, मजुरी कमी होऊन गुंतवणूक खाली येईल.याचा परिणाम देशाला त्यातून बाहेर पडायला फार मोठा काळ लागेल. हेसुद्धा सरकार व्यवस्था ठीक करील आणि ठोस आर्थिक धोरण राबवेल तेव्हाच शक्य आहे, असा इशारा गांधी यांनी दिला.सरकारला पूर्ण पाठिंबा दिल्यानंतरही ते लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करण्यास तयार नाही. कोट्यवधी स्थलांतरित मजदूर, रोेजंदारीवरील लोकांसह अनेकांचा रोजगार गेला, असे त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले की, ‘सरकारने पूर्ण धाडसाने महामारीला तोंड दिले नाही. चीनला सीमेवर तोंड देण्यात सरकारचा कमकुवतपणा दिसला. आम्ही पूर्ण शक्तीनिशी ते संकट निपटून काढणे गरजेचे होते. आमचा हा दुबळेपणा गंभीर संकटाचे कारण ठरेल.’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधी