शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

NDA सरकारमुळे देशासमोर संकटे उभी -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:17 IST

देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : देश आज भयावह आर्थिक संकट, भयंकर महामारी आणि आता चीनशी सीमेवर मोठ्या संकटाला तोंड देत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही संकटे उभी ठाकली आहेत. देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.व्हिडिओद्वारा पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला त्या मार्गदर्शन करीत होत्या. सोनिया गांधी म्हणाल्या, देशासमोरील आर्थिक परिस्थिती आधीच्या अपेक्षेत आणखी गंभीर बनली आहे. मोदी सरकार प्रत्येक सूचनेकडे दुर्लक्ष करते आहे. सरकारी तिजोरीतून गरिबांच्या थेट हातात पैसे दिले जावेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण करून त्यांचे पोषण करणे याला सरकारचे प्राधान्य हवे; परंतु सरकारने पोकळ पॅकेज जाहीर केले. त्यात सकल देशी उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षाही कमी राजकोषीय प्रोत्साहन होते, असेही त्या म्हणाल्या.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले की,आपल्या सैनिकांनी ज्यासाठी बलिदान केले, ती परिस्थिती पंतप्रधानांनी स्वीकारली. चीनकडून जी आगळीक झाली ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे गांधी म्हणाले.>आर्थिक परिस्थिती सावरण्यास लागणार मोठा काळआज भारताची ढासळती अर्थव्यवस्था ४२ वर्षांत प्रथमच तेजीकडून मंदीकडे घसरत चालली आहे. मला भीती वाटते की, यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल, नागरिकांचे उत्पन्न घटेल, मजुरी कमी होऊन गुंतवणूक खाली येईल.याचा परिणाम देशाला त्यातून बाहेर पडायला फार मोठा काळ लागेल. हेसुद्धा सरकार व्यवस्था ठीक करील आणि ठोस आर्थिक धोरण राबवेल तेव्हाच शक्य आहे, असा इशारा गांधी यांनी दिला.सरकारला पूर्ण पाठिंबा दिल्यानंतरही ते लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करण्यास तयार नाही. कोट्यवधी स्थलांतरित मजदूर, रोेजंदारीवरील लोकांसह अनेकांचा रोजगार गेला, असे त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले की, ‘सरकारने पूर्ण धाडसाने महामारीला तोंड दिले नाही. चीनला सीमेवर तोंड देण्यात सरकारचा कमकुवतपणा दिसला. आम्ही पूर्ण शक्तीनिशी ते संकट निपटून काढणे गरजेचे होते. आमचा हा दुबळेपणा गंभीर संकटाचे कारण ठरेल.’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधी