शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अभिषेक मनू सिंघवींच्या सावरकरांवरील 'त्या' ट्विटमुळे सोनिया गांधी संतप्त, मागायला लावली माफी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 17:54 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे.

नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे. सोमवारी महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच अभिषेक मनू सिंघवी यांनी सावरकरांची प्रशंसा करणारे ट्विट केले होते. मात्र या ट्विटमधील आशयामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कमालीच्या संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकरवी सिंघवी यांना संदेश पाठवून फोन करण्यास सांगितले. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण मागवून दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले.  सोमवारी अभिषेक मनू सिंघवी यांनी एक ट्विट करून सावरकर यांची प्रशंसा केली. ''मी वैयक्तिकरीत्या सावरकरांच्या विचारसणीचे समर्थन करत नाही. मात्र सावरकर हे एक परिपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. दलितांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढाई लढली आणि देशासाठी तुरुंगवासही भोगला. हेही नाकारत नाही.'' असे सिंघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

 दरम्यान, अभिषेक मनू सिंघवी यांच्या ट्विटमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. स्पष्टीकरण देण्यासाठी सिंघवींवर दबाव वाढवण्यात आला. त्यामुळे अखेरीस सिंघवी यांना प्रसारमाध्यमांवर येऊन माफी मागावी लागली. सिंघवी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सिंघवी यांना फोन केला. हा फोन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा दावा, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने केला होता.   दरम्यान, सिंघवी यांनी सोमवारी अजून एक ट्विट केले होते. त्यातून त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ''सर्वसमावेशकता ही भारताच्या विचारसरणीची शक्ती आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक प्रवाह राहिले आहेत. मात्र सावरकरांच्या राष्ट्रवादामध्ये अपेक्षित असलेला युद्धोन्माद आणि हिंसक विचारांशी कुणीही सहमत होऊ शकत नाहीत. तसेच त्यांच्या गांधीविरोधी विचारांशीही कुणी सहमत होऊ शकत नाही. मात्र ते राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेले होते, असे आपण म्हणू  शकतो.'' 

टॅग्स :congressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर