शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

‘सोनभद्र’ची कोंडी फुटली; आदिवासी कुटुंबियांशी प्रियांका गांधींची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 02:31 IST

उत्तर प्रदेशातील हत्याकांड। मृत कुटुंबियांनी मिर्झापूरच्या विश्रामगृहावर घेतली प्रियांका गांधी यांची भेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून झालेल्या आदिवासी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांनी शनिवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार येथील विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यातील संघर्ष मिटला.

सोनभद्र येथे बुधवारी एका गावाच्या सरपंचाने १0 गोंड आदिवासींची गोळ््या घालून हत्या केली होती. मृत आदिवासींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी या काल उत्त्तर प्रदेशात आल्या होत्या. तथापि, पोलिसांनी त्यांना सोनभद्रला जाण्यापासून रोखले होते. त्यांना ताब्यात घेऊन विश्रामगृहावर आणण्यात आले होते. सुटका करून घेण्यासाठी वैयक्तिक जात मुचलका सादर करण्याची सूचना पोलिस प्रशासनाने प्रियांका गांधी यांना केली होती. तथापि, प्रियांका गांधी यांनी वैयक्तिक जात मुचलका देण्यास नकार देऊन आपण तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. प्रियांका गांधी या रात्रभर विश्रामगृहावरच मुक्कामी थांबल्या. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.

ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय राय यांनी सांगितले की, आज सकाळी मृत आदिवासींच्या परिवारातील १५ सदस्यांनी प्रियांका गांधी यांची विश्रामगृहावर येऊन भेट घेतली. त्यात सात महिलांचा समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधी यांची विनाअट सुटका केली. त्या वाराणसी मार्गे नवी दिल्लीला परतल्या.

आदिवासींची भेट घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, ज्यांनी मला अटक करून चुनार विश्रामगृहावर आणले होते, ते आता म्हणत आहेत की, तुम्ही कोठेही जाण्यास मुक्त आहात! मी त्यांना सांगू इच्छिते की, सोनभद्र हत्याकांडातील पीडित आदिवासी परिवारांची भेट घेण्यासाठी मी आले होते. माझा हेतू सफल झाला आहे. मी आता जात आहे; पण मी परत येईन. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी काल रात्री उशिरा एक टष्ट्वीट करून ‘प्रशासनाने आपणास पुढे जाऊ न दिल्यास आपण तुरुंगात जाण्यास तयार आहोत’, असे म्हटले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळासही पोलिसांनी वाराणसी विमानतळावर ताब्यात घेतले.

काय आहे घटना?सोनभद्रच्या घोरवाल भागातील उभ्भा गावात हे हत्याकांड घडले आहे. गावचा सरपंच यज्ञ दत्त याने ट्रॅक्टरमध्ये गुंड आणून वादग्रस्त जमीन कसणाऱ्या आदिवासींवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात १0 आदिवासी ठार, तर २८ जण जखमी झाले होते. जखमींत दत्त याच्या ९ समर्थकांचाही समावेश आहे.

आदिवासींचे अश्रू पुसलेभेटायला आलेल्या आदिवासींच्या परिवारांतील सदस्यांचे प्रियांका गांधी यांनी सांत्वन केले. त्यांचे अश्रू पुसले. त्यांना पाणीही दिले. काही पीडित परिवारातील सदस्यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत फोटो काढून या भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जतन केल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश