शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

‘सोनभद्र’ची कोंडी फुटली; आदिवासी कुटुंबियांशी प्रियांका गांधींची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 02:31 IST

उत्तर प्रदेशातील हत्याकांड। मृत कुटुंबियांनी मिर्झापूरच्या विश्रामगृहावर घेतली प्रियांका गांधी यांची भेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून झालेल्या आदिवासी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांनी शनिवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार येथील विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यातील संघर्ष मिटला.

सोनभद्र येथे बुधवारी एका गावाच्या सरपंचाने १0 गोंड आदिवासींची गोळ््या घालून हत्या केली होती. मृत आदिवासींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी या काल उत्त्तर प्रदेशात आल्या होत्या. तथापि, पोलिसांनी त्यांना सोनभद्रला जाण्यापासून रोखले होते. त्यांना ताब्यात घेऊन विश्रामगृहावर आणण्यात आले होते. सुटका करून घेण्यासाठी वैयक्तिक जात मुचलका सादर करण्याची सूचना पोलिस प्रशासनाने प्रियांका गांधी यांना केली होती. तथापि, प्रियांका गांधी यांनी वैयक्तिक जात मुचलका देण्यास नकार देऊन आपण तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. प्रियांका गांधी या रात्रभर विश्रामगृहावरच मुक्कामी थांबल्या. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.

ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय राय यांनी सांगितले की, आज सकाळी मृत आदिवासींच्या परिवारातील १५ सदस्यांनी प्रियांका गांधी यांची विश्रामगृहावर येऊन भेट घेतली. त्यात सात महिलांचा समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधी यांची विनाअट सुटका केली. त्या वाराणसी मार्गे नवी दिल्लीला परतल्या.

आदिवासींची भेट घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, ज्यांनी मला अटक करून चुनार विश्रामगृहावर आणले होते, ते आता म्हणत आहेत की, तुम्ही कोठेही जाण्यास मुक्त आहात! मी त्यांना सांगू इच्छिते की, सोनभद्र हत्याकांडातील पीडित आदिवासी परिवारांची भेट घेण्यासाठी मी आले होते. माझा हेतू सफल झाला आहे. मी आता जात आहे; पण मी परत येईन. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी काल रात्री उशिरा एक टष्ट्वीट करून ‘प्रशासनाने आपणास पुढे जाऊ न दिल्यास आपण तुरुंगात जाण्यास तयार आहोत’, असे म्हटले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळासही पोलिसांनी वाराणसी विमानतळावर ताब्यात घेतले.

काय आहे घटना?सोनभद्रच्या घोरवाल भागातील उभ्भा गावात हे हत्याकांड घडले आहे. गावचा सरपंच यज्ञ दत्त याने ट्रॅक्टरमध्ये गुंड आणून वादग्रस्त जमीन कसणाऱ्या आदिवासींवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात १0 आदिवासी ठार, तर २८ जण जखमी झाले होते. जखमींत दत्त याच्या ९ समर्थकांचाही समावेश आहे.

आदिवासींचे अश्रू पुसलेभेटायला आलेल्या आदिवासींच्या परिवारांतील सदस्यांचे प्रियांका गांधी यांनी सांत्वन केले. त्यांचे अश्रू पुसले. त्यांना पाणीही दिले. काही पीडित परिवारातील सदस्यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत फोटो काढून या भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जतन केल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश