शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 08:40 IST

Delhi Police : लडाखहून दिल्लीत आंदोलन करण्यासाठी आलेल्या सोनम वांगचुक यांना सिंघू सीमेवर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Rahul Gandhi on Detains Sonam Wangchuk : दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले आहे. सोनम वांगचुक यांच्यासोबत जवळपास १३० लोक आंदोलनासाठी दिल्लीत येत होते. मात्र सोनम वांगचुक हरियाणातून दिल्लीत दाखल होताच दिल्ली पोलिसांनी सर्वांना सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी सोनम यांच्यासह सर्वांना ताब्यात घेतले आहे. सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार मोडला जाईल असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

लडाखमध्ये काही दिवसांपूर्वी उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह लडाखमधील १३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोनम वांगचुक हे त्यांच्या ७०० किलोमीटर लांब 'दिल्ली चलो पदयात्रे' दरम्यान हरियाणातून दिल्लीत दाखल होताच पोलिसांनी त्याना रोखले. त्ंयाच्यासोबत लडाखमधील सुमारे १३० नागरिकही आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने येत होते. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक्स पोस्टमधून राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला आहे.

"पर्यावरण आणि घटनात्मक हक्कांसाठी शांततेने मोर्चे काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लडाखमधील लोकांना ताब्यात घेणे अस्वीकार्य आहे. लडाखच्या भवितव्यासाठी उभ्या असलेल्या या लोकांना दिल्ली सीमेवर का अडवले जात आहे? मोदीजी, शेतकऱ्यांप्रमाणेच हे चक्रव्यूहही मोडेल जाईल आणि तुमचा अहंकारही मोडेल. तुम्हाला लडाखमधील लोकांचा आवाज ऐकावा लागेल," असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिल्लीतील अनेक भागात बीएनएस कलम १६३ लागू केले आहे. त्यानुसार ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास, आंदोलन करण्यास बंदी करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ मेसेज जारी केला होता. त्यांनी प्रशासनावर आरोप केला की पोलीस त्यांचा शांततापूर्ण मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली सीमेवर हजारो पोलिसांचा फौजफाटा जमा झाला आहे. मला ताब्यात घेतल्यानंतर कुठे नेले जाईल याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचेही सोनम वांगचुक म्हणाले.

सोनम वांगचुक आंदोलन का करत आहेत?

सोनम वांगचुक १ सप्टेंबर रोजी सुमारे १३० लोकांसह लडाखहून दिल्लीसाठी निघाले होते. ते हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती, मनाली, कुल्लू, मंडी, चंदीगड मार्गे दिल्लीच्या सीमारेषेवर पोहोचले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सातत्याने लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी आणि लडाखसाठी लोकसेवा आयोग असावा अशीही त्यांची मागणी आहे. लडाख आणि कारगिलसाठी लोकसभेच्या स्वतंत्र जागा देण्याचीही त्यांची मागणी आहे.

टॅग्स :delhiदिल्लीRahul Gandhiराहुल गांधीladakhलडाख