शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 20 वर्षानंतर घेतला वडिलांच्या मृत्यूचा सूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:59 IST

राजकुमार यांचा आरोपी दिपक कुमार याच्या वडिलांच्या हत्येत सहभाग होता

गुरुग्राम, दि. 26 - सेक्टर 69 मध्ये राहणा-या एका प्रॉपर्टी डिलरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांपुर्वी दोन कुटुंबात झालेल्या भांडणातून ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकुमार असं हत्या झालेल्या पीडित व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमार यांचा आरोपी दिपक कुमार याच्या वडिलांच्या हत्येत सहभाग होता. 20 वर्षांपुर्वी ही हत्या झाली होती. 

पोलिसांनी दिपकविरोधात मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद केला आहे. राजकुमार रात्री 11 वाजता सोहना रोड येथील आपल्या कार्यालयामधून घरी जात असताना चार ते पाच जणांनी त्यांचा पाठलाग केला. गाडी अडवून गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. जवळपास आठ गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या. छाती, डोकं आणि पायावर गोळ्या झाडण्यात आल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बादशहापूर येथे इस्कॉन टेम्पलजवळ राजकुमार यांच्या गाडीचा एका गाडीने पाठलाग सुरु केला होता. आपल्या गाडीचा पाठलाग होत असल्याचं राजकुमार यांनी कदाचित ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी गाडी वेगाने चालवण्यास सुरुवात केली. मात्र त्यांची गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली. यानंतर आरोपींनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. यानंतरही राजकुमार गाडीतून निघून सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. जवळच्या एका घरात जाऊन ते लपले मात्र आरोपींनी त्यांचा शोध घेतला आणि गोळ्या घालून हत्या केली'. 

राजकुमार यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याच गावात राहणा-या दिपकविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आरोपींनी वापरलेली कार जप्त केली आहे, मात्र आरोपी अद्यापही फरार आहेत. 

'राजकुमार यांच्या वडिलांनी आठ जणांची नावं दिली असून आम्ही त्यांची तपासणी करत आहोत', अशी माहिती पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार यांनी दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं तयार केली आहेत. 

राजकुमार यांना दिपकचे वडिल ब्रम्हप्रकाश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तीन महिने कारागृहात घालवल्यानंतर न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. दोन्ही कुटुंबांनी तडजोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुटका करण्यात आली होती.