शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 16:33 IST

आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो. 

देशात अनेक घटना घडत असतात. अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका शहिदाच्या मुलाचा व्हॉईस मेसेज वाचून ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. सात वर्षांचा कबीर आपल्या वडिलांना "पप्पा फक्त एकदा परत या आणि परत मिशनवर जा..." असा व्हॉईस मेसेज आजही पाठवतो. आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो. 

कबीरचे वडील कर्नल मनप्रीत सिंह हे गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये एका ऑपरेशनमध्ये शहीद झाले. गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी गडुल गावाच्या जंगलात सैनिकांसह कर्नल मनप्रीत सिंह यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. कर्नल सिंह, मेजर आशिष धोंचक, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायूं भट आणि कॉन्स्टेबल प्रदीप सिंह हे शहीद झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला पण सर्वात मोठा फटका निरागस मुलाला बसला जो दररोज वडिलांच्या येण्याची वाट पाहतो.

कर्नल सिंह यांच्या पत्नी जगमीत यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीने दोन चिनारची झाडं लावली होती. प्रेमाने त्या झाडांची नावं ही आपल्या मुलांच्या नावानुसार कबीर आणि वाणी अशी ठेवली होती. कर्नल सिंह हे काश्मीरमधील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी खूप उत्साही होते. त्यांना रात्री मदतीसाठी फोन यायचे आणि ते देखील लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असायचे. स्थानिक लोक देखील त्यांना आपल्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवायचे. 

कर्नल सिंह आणि त्यांची पत्नी जगमीत यांच्यात अवघ्या 32 सेकंदांचं शेवटचं संभाषण झालं होतं. मी ऑपरेशनमध्ये आहे, हे त्यांचे शेवटचे शब्द होते, त्यानंतर मी त्यांच्याशी कधीच बोलू शकले नाही असं जगमीत यांनी म्हटलं आहे.  अनंतनागची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू रुबिया सईद हिने कर्नल सिंह यांच्याबाबत सांगितलं आहे. तिने आठवणींना उजाळा दिला आहे. 

समाज घडवण्यात खेळाची महत्त्वाची भूमिका आहे यावर कर्नल सिंह यांचा विश्वास होता. ड्रग्सच्या आहारी गेलेले तसेच अनेक जण व्यसनी होते, ज्यांना त्यांनी योग्य मार्ग दाखवला. महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी प्रयत्न केले. कर्नल सिंह यांचे लक्ष हे क्रीडा आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला समाज निर्माण करण्यावर होतं. त्यांच्यासारखा सज्जन अधिकारी मी पाहिला नाही असंही म्हटलं आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान