शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 16:33 IST

आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो. 

देशात अनेक घटना घडत असतात. अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका शहिदाच्या मुलाचा व्हॉईस मेसेज वाचून ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. सात वर्षांचा कबीर आपल्या वडिलांना "पप्पा फक्त एकदा परत या आणि परत मिशनवर जा..." असा व्हॉईस मेसेज आजही पाठवतो. आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो. 

कबीरचे वडील कर्नल मनप्रीत सिंह हे गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये एका ऑपरेशनमध्ये शहीद झाले. गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी गडुल गावाच्या जंगलात सैनिकांसह कर्नल मनप्रीत सिंह यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. कर्नल सिंह, मेजर आशिष धोंचक, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायूं भट आणि कॉन्स्टेबल प्रदीप सिंह हे शहीद झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला पण सर्वात मोठा फटका निरागस मुलाला बसला जो दररोज वडिलांच्या येण्याची वाट पाहतो.

कर्नल सिंह यांच्या पत्नी जगमीत यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीने दोन चिनारची झाडं लावली होती. प्रेमाने त्या झाडांची नावं ही आपल्या मुलांच्या नावानुसार कबीर आणि वाणी अशी ठेवली होती. कर्नल सिंह हे काश्मीरमधील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी खूप उत्साही होते. त्यांना रात्री मदतीसाठी फोन यायचे आणि ते देखील लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असायचे. स्थानिक लोक देखील त्यांना आपल्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवायचे. 

कर्नल सिंह आणि त्यांची पत्नी जगमीत यांच्यात अवघ्या 32 सेकंदांचं शेवटचं संभाषण झालं होतं. मी ऑपरेशनमध्ये आहे, हे त्यांचे शेवटचे शब्द होते, त्यानंतर मी त्यांच्याशी कधीच बोलू शकले नाही असं जगमीत यांनी म्हटलं आहे.  अनंतनागची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू रुबिया सईद हिने कर्नल सिंह यांच्याबाबत सांगितलं आहे. तिने आठवणींना उजाळा दिला आहे. 

समाज घडवण्यात खेळाची महत्त्वाची भूमिका आहे यावर कर्नल सिंह यांचा विश्वास होता. ड्रग्सच्या आहारी गेलेले तसेच अनेक जण व्यसनी होते, ज्यांना त्यांनी योग्य मार्ग दाखवला. महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी प्रयत्न केले. कर्नल सिंह यांचे लक्ष हे क्रीडा आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला समाज निर्माण करण्यावर होतं. त्यांच्यासारखा सज्जन अधिकारी मी पाहिला नाही असंही म्हटलं आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान