शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:14 IST

एका जावयाने पत्नीच्या माहेरी जाण्याच्या रागातून आपल्या सासऱ्यावर गोळी झाडली, तर या हल्ल्यात सासऱ्याचा मोठा भाऊ थोडक्यात बचावला. मात्र...

कौटुंबिक कलहातून गुन्हेगारीचे टोक गाठणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात घडली आहे. इथे एका जावयाने पत्नीच्या माहेरी जाण्याच्या रागातून आपल्या सासऱ्यावर गोळी झाडली, तर या हल्ल्यात सासऱ्याचा मोठा भाऊ थोडक्यात बचावला. मात्र, या हल्ल्यानंतर पळण्याचा प्रयत्न करताना आरोपी स्वतःच पुराच्या पाण्यात अडकला, आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ही घटना जिल्ह्यातील दुंदेमई गावात घडली. स्थानिक रहिवासी मायाराम हे दुपारी कंपिल येथील एका मंदिराच्या जवळ बसले होते, तेव्हा त्यांचा जावई सुनील तिथे आला. सुनील आणि त्याच्या सासरच्या मंडळींमध्ये काही जुन्या कौटुंबिक वादातून बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या सुनीलने सोबत आणलेल्या देशी कट्ट्याने मायाराम यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने, मायाराम यांना ती गोळी लागली नाही आणि ते बचावले.

त्यानंतर सुनीलने पुन्हा गोळी झाडण्यासाठी कट्टा रोखला, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे गोंधळात पडलेल्या सुनीलने पळ काढला. पळत असताना त्याने आपले सासरे, रक्षपाल, यांना गाठले आणि त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने रक्षपाल गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी लोहिया रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जावई पुराच्या पाण्यात अडकला!

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी तातडीने शोधमोहीम सुरू केली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला चहुबाजूंनी घेराव घातला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी जवळच्याच पुराच्या पाण्यात उतरला. त्याला वाटले की, तो सहज पोहून पळून जाईल. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तेव्हा त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनीच धाव घेतली. गावकऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

हल्ल्यामागचे कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनीलचे लग्न चार वर्षांपूर्वी रक्षपाल यांची मुलगी प्रियंका हिच्यासोबत झाले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनात सतत वाद होत असल्याने प्रियंका काही काळापासून आपल्या माहेरी परतली होती आणि ती तिच्या काकांकडे राहत होती. याच गोष्टीचा जावयाला राग होता. याच रागातून त्याने सासरच्या लोकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश