शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:14 IST

एका जावयाने पत्नीच्या माहेरी जाण्याच्या रागातून आपल्या सासऱ्यावर गोळी झाडली, तर या हल्ल्यात सासऱ्याचा मोठा भाऊ थोडक्यात बचावला. मात्र...

कौटुंबिक कलहातून गुन्हेगारीचे टोक गाठणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात घडली आहे. इथे एका जावयाने पत्नीच्या माहेरी जाण्याच्या रागातून आपल्या सासऱ्यावर गोळी झाडली, तर या हल्ल्यात सासऱ्याचा मोठा भाऊ थोडक्यात बचावला. मात्र, या हल्ल्यानंतर पळण्याचा प्रयत्न करताना आरोपी स्वतःच पुराच्या पाण्यात अडकला, आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ही घटना जिल्ह्यातील दुंदेमई गावात घडली. स्थानिक रहिवासी मायाराम हे दुपारी कंपिल येथील एका मंदिराच्या जवळ बसले होते, तेव्हा त्यांचा जावई सुनील तिथे आला. सुनील आणि त्याच्या सासरच्या मंडळींमध्ये काही जुन्या कौटुंबिक वादातून बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या सुनीलने सोबत आणलेल्या देशी कट्ट्याने मायाराम यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने, मायाराम यांना ती गोळी लागली नाही आणि ते बचावले.

त्यानंतर सुनीलने पुन्हा गोळी झाडण्यासाठी कट्टा रोखला, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे गोंधळात पडलेल्या सुनीलने पळ काढला. पळत असताना त्याने आपले सासरे, रक्षपाल, यांना गाठले आणि त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने रक्षपाल गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी लोहिया रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जावई पुराच्या पाण्यात अडकला!

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी तातडीने शोधमोहीम सुरू केली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला चहुबाजूंनी घेराव घातला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी जवळच्याच पुराच्या पाण्यात उतरला. त्याला वाटले की, तो सहज पोहून पळून जाईल. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तेव्हा त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनीच धाव घेतली. गावकऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

हल्ल्यामागचे कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनीलचे लग्न चार वर्षांपूर्वी रक्षपाल यांची मुलगी प्रियंका हिच्यासोबत झाले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनात सतत वाद होत असल्याने प्रियंका काही काळापासून आपल्या माहेरी परतली होती आणि ती तिच्या काकांकडे राहत होती. याच गोष्टीचा जावयाला राग होता. याच रागातून त्याने सासरच्या लोकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश