शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा गरजेची, रा. स्व. संघाचे नेते भय्याजी जोशी यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:26 IST

Bhaiyaji Joshi News: अहिंसा या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा आवश्यक असते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी गुरुवारी सांगितले.

अहमदाबाद -अहिंसा या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा आवश्यक असते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी गुरुवारी सांगितले. अहमदाबाद येथे गुजरात विद्यापीठाच्या मैदानावर आयोजिलेल्या हिंदू आध्यात्मिक परंपरा आणि सेवा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले. भारताने शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन जायला हवे, असेही ते म्हणाले.

जोशी म्हणाले की, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदू सदैव तत्पर असतात. त्यासाठी हिंदूंना अशा काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याला दुसरे लोक अधर्म म्हणतील. आपल्या पूर्वजांनी धर्मरक्षणाचे काम उत्तम प्रकारे केले आहे. पांडवांनी अधर्माचा नाश करण्यासाठी काही नियम, संकेत बाजूला ठेवले. त्याची उदाहरणे महाभारतातील लढाईत दिसून येतात. हिंदू धर्मात अहिंसेला महत्त्व आहे. मात्र अहिंसेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसेचा वापर करावा लागतो. अन्यथा अहिंसा ही संकल्पना टिकू शकणार नाही. नेमका हाच संदेश पूर्वजांनी दिला आहे. जो सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करतो, तोच शांतता प्रस्थापित करू शकतो. (वृत्तसंस्था)

बलवान भारत व बलवान हिंदू हे जगासाठी उपकारक ते म्हणाले की, एखादा धर्म दुसऱ्यांच्या श्रद्धांवर गदा आणू पाहात असेल तर त्यावेळी शांतता नांदणार नाही. भारताने वसुधैव कुटुम्बकम हा विचार जगाला दिला आहे. सर्व देशांना सोबत घेऊन वाटचाल करणे हे काम भारताशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही.बलवान भारत व बलवान हिंदू समाज हे जगासाठी उपकारक आहेत. भारत दुर्बल, शोषित व्यक्तींचे रक्षण करण्यास समर्थ आहे. काही धार्मिक संस्थाच नि:स्वार्थ सेवा करतात असा एक गैरसमज आहे. मात्र आपली मंदिरे, गुरुद्वारांमध्ये दररोज एक कोटी लोकांना मोफत जेवण दिले जाते. हिंदूंच्या संस्थांचे काम केवळ धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते शाळा, गुरुकुल, रुग्णालयेही चालवितात, असेही जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत