शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कधी-कधी हिंसा आवश्यक असते, हिंदू आपल्या धर्माच्या रक्षणासाठी कटीबद्ध - भैयाजी जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:22 IST

भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे...

अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी कधीकधी हिंसाही आवश्यक असते. याच बरोबर, भारतीय नागरिकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटेल आहे. ते गुरुवारी गुजरात विद्यापीठाच्या मैदानात आयोजित हिंदू आध्यात्मिक सेवा मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  

भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे.

महाभारताच्या युद्धाचा उल्लेख करत ते म्हणाले, पांडवांनीही धर्माचे रक्षण करण्यासाठी युद्धाच्या नियमांकडे उल्लंघन केले. हिंदू धर्मात अहिंसेचे तत्व उपजतच आहे, हे नाकारता येत नाही. मात्र, कधीकधी आपल्याला अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी हिंसाचाराचाही अवलंब करावा लागतो. अन्यथा अहिंसेचा विचार कधीही सुरक्षित राहणार नाही. आपल्या महान पूर्वजांनी आपल्याला हा संदेश दिला आहे.

"भारतीय लोकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. जे सर्वांना सोबत घेऊन चालण्यात सक्षम आहेत, तेच शांतता प्रस्थापित करू शकता. जर एखादा धर्म दुसऱ्याला आपापल्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देत नसेल तर, शांतता प्रस्थापित होणार नाही. भारताशिवाय असा कुठलाही देश नाही, जो सर्वांना सोबत घेऊन चालण्यास सक्षम आहे. 'वसुधैव कुटुंबकम' (विश्व एक कुटुंब आहे.) हा आमपाला विचार आहे. जर आपण संपूर्ण विश्वाला कुटुंब मानले, तर कुठलाही संघर्ष होणार नाही," असेही भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू