शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

कधी-कधी हिंसा आवश्यक असते, हिंदू आपल्या धर्माच्या रक्षणासाठी कटीबद्ध - भैयाजी जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:22 IST

भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे...

अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी कधीकधी हिंसाही आवश्यक असते. याच बरोबर, भारतीय नागरिकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटेल आहे. ते गुरुवारी गुजरात विद्यापीठाच्या मैदानात आयोजित हिंदू आध्यात्मिक सेवा मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  

भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे.

महाभारताच्या युद्धाचा उल्लेख करत ते म्हणाले, पांडवांनीही धर्माचे रक्षण करण्यासाठी युद्धाच्या नियमांकडे उल्लंघन केले. हिंदू धर्मात अहिंसेचे तत्व उपजतच आहे, हे नाकारता येत नाही. मात्र, कधीकधी आपल्याला अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी हिंसाचाराचाही अवलंब करावा लागतो. अन्यथा अहिंसेचा विचार कधीही सुरक्षित राहणार नाही. आपल्या महान पूर्वजांनी आपल्याला हा संदेश दिला आहे.

"भारतीय लोकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. जे सर्वांना सोबत घेऊन चालण्यात सक्षम आहेत, तेच शांतता प्रस्थापित करू शकता. जर एखादा धर्म दुसऱ्याला आपापल्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देत नसेल तर, शांतता प्रस्थापित होणार नाही. भारताशिवाय असा कुठलाही देश नाही, जो सर्वांना सोबत घेऊन चालण्यास सक्षम आहे. 'वसुधैव कुटुंबकम' (विश्व एक कुटुंब आहे.) हा आमपाला विचार आहे. जर आपण संपूर्ण विश्वाला कुटुंब मानले, तर कुठलाही संघर्ष होणार नाही," असेही भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू