शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

भारत-सिंगापूर व्यापारी संबंधांत काही राज्यांचीही असेल महत्त्वाची भागीदारी - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 05:06 IST

वार्षिक ४८ लाख कंटेनर हाताळणी क्षमतेच्या भारत-मुंबई कंटेनर टर्मिनलचा शुभारंभ

उरण - भारत-सिंगापूर व्यापारी संबंधांमध्ये देशातील काही राज्येही महत्त्वपूर्ण भागीदार असतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. ‘पीपीपी’च्या माध्यमातून जेएनपीएने ११,४०० कोटी खर्च करून बंदरातील सर्वाधिक लांबीच्या आणि वार्षिक ४८ लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेल्या भारत-मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी-सिंगापूर पोर्ट) बंदराचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.   

गेल्यावर्षी सिंगापूर दौऱ्यात दोन्ही देशांच्या संबंधांना व्यापक सामरिक भागीदारीचा दर्जा दिला होता. या वर्षभरात परस्पर संवाद आणि सहकार्य गतिशील आणि दृढ झाले आहे.  आमचे सहकार्य केवळ पारंपरिक क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही. बदलत्या काळानुसार प्रगत उत्पादन, हरित नौवहन, कौशल्यवर्धन, नागरी आण्विक आणि नागरी जलव्यवस्थापन ही क्षेत्रेही आमच्या सहकार्याचे केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

समुद्री क्षेत्रात महाराष्ट्र महासत्ता बनेलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल, असा विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे, असे त्यांनी सांगितले.

पाठिंब्याबद्दल  मानले आभारपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांप्रति संवेदना, दहशतवाद विरुद्धच्या आमच्या लढाईला पाठिंबा दिल्याबद्दल  पंतप्रधान वॉन्ग आणि सिंगापूर सरकारचे आभारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :JapanजपानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस