शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

लवकरच डोकलाम मुद्द्यावर तोडगा निघालेला दिसेल - राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 13:33 IST

डोकलाम मुद्यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे

नवी दिल्ली, दि. 21 - डोकलाम मुद्यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. 'भारताला कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायचा नसून, शांतता हवी असल्याने डोकलाम मुद्द्यावर लवकरच तोडगा निघालेला पहायला मिळेल', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

'डोकलाम मुद्द्यार लवकरच तोडगा काढला जाईल. मी आपल्या शेजा-यांना सांगू इच्छितो की, भारताला शांतता हवी आहे, कोणताही संघर्ष नाही', असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 'चीनदेखील सकारात्मक पाऊल उचलत तोडगा काढण्यासाठी मदत करेल', असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. 

पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'आपण आपल्या आयुष्यातील मित्र बदलू शकतो, पण शेजारी बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्या शेजा-यांसोबत चांगले संबंध असणं खूप महत्वाचं आहे'. राजनाथ सिंह यांनी शांतता राहावी यावर जोर दिला असला तरी आपले सैनिक भ्याड नसल्याचं सांगताना कौतुक केलं आहे. राजनाथ सिंग यांनी यावेळी आपल्या लदाख दौ-याची माहिती दिली. इतक्या कडक थंडीतही जवान कशाचीही पर्वा न करता खंबीरपणे उभे होते असं राजनात सिंह यांनी सांगितंल. 

'मी एकदा लदाखला गेलो होते. आयुष्यात कधीही अनुभवली नव्हती इतकी भयानक थंडी वाजत होती. आयटीबीपीचे जवान मला उद्या सकाळी भेटणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. इतक्या भयानक थंडीत जवान दमलेले आणि गारठलेले असतील असं मला वाटलं होतं. पण त्यांना पाहून मी अवाक झालो. त्या थंडीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. त्यांच्यातील ती आग पाहून एक मात्र मी नक्की सांगू शकतो की कोणीही भारताकडे डोळे वटारुन पाहण्याची हिंमत करणार नाही', असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. 

'आपले जवान अत्यंत शूरवीर असून जेव्हा कधी मी जवानांना पाहतो तेव्हा भारताचा पराभव करणं अशक्य असल्याची जाणीव होते. जगामधील कोणतीही शक्ती भारताचा पराभव करु शकत नाही', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDoklamडोकलामchinaचीनIndian Armyभारतीय जवान