शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांचा राजीनामा, उच्च विधी अधिकाºयांच्या चमूला पुन्हा खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 05:20 IST

देशातील उच्च विधी अधिकाºयांच्या चमूत पुन्हा खिंडार पडले आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर आता सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी राजीनामा दिला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : देशातील उच्च विधी अधिकाºयांच्या चमूत पुन्हा खिंडार पडले आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर आता सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी राजीनामा दिला आहे. सॉलिसिटर जनरल हे विधी अधिकाºयाचे दुसरे वरिष्ठ पद आहे. रोहतगी यांनी गेल्या जूनमध्ये राजीनामा दिल्यानंतर रणजितकुमारही पद सोडतील असे बोलले जात होते. ती चर्चा विलंबाने, पण खरी ठरली.रणजितकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना पद सोडण्यामागील कारण सांगितले. गेल्यावर्षी वडिलांचे निधन झाले व आता आई आजारी आहे. आईची काळजी घ्यायची आहे असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी शासनासंदर्भात काहीच तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अख्त्यारितील कार्मिक विभागाने तीन महिन्यांपूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे विधी अधिकाºयांमध्ये अनिश्चिततेची भावना बळावली आहे. विधी अधिकाºयांची मुदतवाढाुढील आदेशापर्यंतच राहील असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात कार्यकाळाचा निश्चित उल्लेख करण्यात आलेला नाही. रोहतगी व रणजितकुमार यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यापूर्वी दोघांनाही त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांपर्यंत किंवा शासन सत्तेत असेपर्यंत म्हणजे, मे-२०१९ पर्यंत वाढविला जाईल अशी अपेक्षा होती. दरम्यान, शासनाची रोहतगी यांना पदावर कायम ठेवण्याची तयारी असतानाही त्यांनी अधिसूचना अमान्य करून राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर रोहतगी यांनी खासगी वकिली करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्यासोबत रणजितकुमारही राजीनामा देतील असे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही व आता वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले. अलीकडे ते सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची प्रकरणे हाताळत नाहीत.

टॅग्स :GovernmentसरकारIndiaभारत