शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

LAC वर तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार, चिन्यांवर होणार तगडा प्रहार

By बाळकृष्ण परब | Updated: October 6, 2020 22:44 IST

Indian army News : आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.

ठळक मुद्देअमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या  करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेतलष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे

नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लडाखमधील एलएसीवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या चीनसमोर भारताने आपले लष्कर उभे केले आहे. दरम्यान आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या  करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेत. आता लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे.

भारताने फास्ट ट्रॅक खरेदी कार्यक्रमांतर्गत या रायफल्स खरेदी केल्या होत्या. नव्या रायफल्सना सध्याच्या भारतीय स्मॉल आर्म्स सिस्टिम रायफलमधून बदलण्यात येईल. या रायफल्सचा वापर सध्या भारतीय सुरक्षा बलांकडून करण्यात येत आहे.आखलेल्या योजनेनुसार सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी अभियानांसाठी आणि एलओसीवर तैनात जवान आयात करण्यात आलेल्या सुमारे दीड लाख रायफल्सचा वापर करणार आहेत. तर इतर सुरक्षा दलांना एके-२०३ रायफल्स देण्यात येतील. या रायफल्सची निर्मिती रशिया आणि भारत यांनी अमेठी येथे संयुक्तपणे उभारलेल्या अमेठी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाने लाइट मशीन गनची मागणी पूर्ण करण्यासाठी इस्राइलला १६ हजार एलएमजीची ऑर्डर दिली आहे.भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव आहे. भारताने चीनच्या सीमेवरील आक्रमणाला अत्यंत आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले आहे. विशेषकरून गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्यानंतर भारताकडून अधिकच आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाख