शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

LAC वर तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार, चिन्यांवर होणार तगडा प्रहार

By बाळकृष्ण परब | Updated: October 6, 2020 22:44 IST

Indian army News : आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.

ठळक मुद्देअमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या  करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेतलष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे

नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लडाखमधील एलएसीवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या चीनसमोर भारताने आपले लष्कर उभे केले आहे. दरम्यान आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या  करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेत. आता लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे.

भारताने फास्ट ट्रॅक खरेदी कार्यक्रमांतर्गत या रायफल्स खरेदी केल्या होत्या. नव्या रायफल्सना सध्याच्या भारतीय स्मॉल आर्म्स सिस्टिम रायफलमधून बदलण्यात येईल. या रायफल्सचा वापर सध्या भारतीय सुरक्षा बलांकडून करण्यात येत आहे.आखलेल्या योजनेनुसार सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी अभियानांसाठी आणि एलओसीवर तैनात जवान आयात करण्यात आलेल्या सुमारे दीड लाख रायफल्सचा वापर करणार आहेत. तर इतर सुरक्षा दलांना एके-२०३ रायफल्स देण्यात येतील. या रायफल्सची निर्मिती रशिया आणि भारत यांनी अमेठी येथे संयुक्तपणे उभारलेल्या अमेठी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाने लाइट मशीन गनची मागणी पूर्ण करण्यासाठी इस्राइलला १६ हजार एलएमजीची ऑर्डर दिली आहे.भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव आहे. भारताने चीनच्या सीमेवरील आक्रमणाला अत्यंत आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले आहे. विशेषकरून गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्यानंतर भारताकडून अधिकच आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाख