शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:03 IST

एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला.

मनोज कुमार राय यांची प्रेरणादायी कथा त्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण आहे जे कठीण परिस्थितीतही आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करतात. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला. या संघर्षानंतरही मनोज यांनी हार मानली नाही आणि आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं.

१९९६ मध्ये, मनोज आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी दिल्लीला गेले, जिथे त्यांनी भाज्या विकल्या तसेच अनेक कार्यालयांमध्ये क्लिनर म्हणून काम केलं. एके दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सामान पोहोचवत असताना त्यांना काही विद्यार्थी भेटले. या विद्यार्थ्यांनी मनोज यांना यूपीएससी परीक्षेबद्दल सांगितलं आणि त्याचवेळी मनोज यांनी ठरवलं की, त्यांनाही आयएएस होऊन आपल्या कुटुंबाची आणि गावाची गरिबी संपवायची आहे. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मनोज यांनी दिल्लीच्या अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बीएचा अभ्यास सुरू केला. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी ते अजूनही भाजीपाला विकत राहिले. २००० मध्ये त्यांनी बीएची पदवी पूर्ण केली, त्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी तीन वर्षे अहोरात्र मेहनत केली. प्रत्येक अयशस्वी प्रयत्नाने त्यांना अधिक मजबूत केलं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं.

यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत तीन वेळा नापास होऊनही मनोज यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी त्यांनी आपली रणनीती सुधारली आणि पूर्ण प्रामाणिकपणे तयारी सुरू ठेवली. २०१० मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांना ८७० वा रँक मिळाला आणि आयएएस होण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालं. अथक परिश्रम, संयम आणि जिद्द हेच त्यांच्या यशामागचं कारण होतं. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी