शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:03 IST

एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला.

मनोज कुमार राय यांची प्रेरणादायी कथा त्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण आहे जे कठीण परिस्थितीतही आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करतात. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला. या संघर्षानंतरही मनोज यांनी हार मानली नाही आणि आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं.

१९९६ मध्ये, मनोज आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी दिल्लीला गेले, जिथे त्यांनी भाज्या विकल्या तसेच अनेक कार्यालयांमध्ये क्लिनर म्हणून काम केलं. एके दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सामान पोहोचवत असताना त्यांना काही विद्यार्थी भेटले. या विद्यार्थ्यांनी मनोज यांना यूपीएससी परीक्षेबद्दल सांगितलं आणि त्याचवेळी मनोज यांनी ठरवलं की, त्यांनाही आयएएस होऊन आपल्या कुटुंबाची आणि गावाची गरिबी संपवायची आहे. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मनोज यांनी दिल्लीच्या अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बीएचा अभ्यास सुरू केला. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी ते अजूनही भाजीपाला विकत राहिले. २००० मध्ये त्यांनी बीएची पदवी पूर्ण केली, त्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी तीन वर्षे अहोरात्र मेहनत केली. प्रत्येक अयशस्वी प्रयत्नाने त्यांना अधिक मजबूत केलं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं.

यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत तीन वेळा नापास होऊनही मनोज यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी त्यांनी आपली रणनीती सुधारली आणि पूर्ण प्रामाणिकपणे तयारी सुरू ठेवली. २०१० मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांना ८७० वा रँक मिळाला आणि आयएएस होण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालं. अथक परिश्रम, संयम आणि जिद्द हेच त्यांच्या यशामागचं कारण होतं. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी