शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नितीश सरकारचे फर्मान! शासन, प्रशासनाविरुद्ध बोललात तर खबरदार; थेट कारवाई होणार

By देवेश फडके | Updated: January 22, 2021 12:28 IST

बिहारमध्ये सोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे.

ठळक मुद्देशासन, प्रशासनाविरोधात सोशल मीडियावर टिप्पणी पडणार महागातआक्षेपार्ह आणि अवमानकारक विधाने केल्यास थेट कारवाई होणारबिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांचे पत्र

पाटणा :बिहारमध्येसोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहारमधील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानजनक पोस्ट करेल किंवा उलट-सुलट बोलेल, त्या युझरवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे. या पत्रात सदर माहिती देण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे की, सोशल मीडियामध्ये सरकार, मंत्री, खासदार, आमदार तसेच सरकारी पदाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह, अपमानजनक आणि भ्रामक भाषेचा वापर अनेकदा करण्यात येतो. सायबर कायद्यानुसार हा गुन्हा आहे. असा कोणताही प्रकार समोर आल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पोलिसांना सूचना, माहिती देईल. यामुळे दोषींविरोधात प्रभावी कारवाई करता येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

अतिरिक्त महासंचालकांचे पत्र समोर येताच आता यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाला बिहार सरकार घाबरत आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला आहे. जाहिरातींमार्फत सरकार आपला अजेंडा राबवत आहे. यामुळे खऱ्या बातम्या दाबल्या जात आहेत. मात्र, सोशल मीडियातून सत्य बाहेर येते. त्यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी कारवाई करण्याची भाषा केली जात आहे. नितीश कुमारांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते शक्ती यादव यांनी केला आहे. 

दुसरीकडे, राजद नेते तेजस्वी यादव यांनी सोशय मीडियावर ट्विट करत नितीश कुमार सरकारला आव्हान दिले आहे. ६० घोटाळ्यांचे सृजनकर्ता नितीश कुमार हे भ्रष्टाचाराचे भीष्म पीतामह, अट्टल गुन्हेगारांचे संरक्षणकर्ते आणि अवैध सरकारचे कमकुवत प्रमुख आहेत. बिहार पोलीस दारू विक्रीचे काम करत आहे. गुन्हेगारांना पाठिशी घातले जात असून, निरपराध व्यक्तींना शिक्षा केली जात आहे. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, या आदेशानुसार मला अटक करावी, असे तेजस्वी यादव यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया