बंगळुरू/अमरावती : कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार आहे. कर्नाटकात १६ वर्षांखालील तर आंध्रात १३ वर्षांखालील मुलांसाठी ही बंदी लागू असणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली. मुलांचे मानसिक आरोग्य, नवीन काही शिकण्याच्या क्षमता आणि त्यात लागलेले डिजिटल व्यसन लक्षात घेता कठोर नियम अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वाढता स्क्रीन टाईम मुलांच्या वर्तनावर, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करत आहेत. त्यासाठी १६ वर्षांखालील मुलांसाठी हा नियम केला जाणार आहे.
बंदीमागील प्रमुख उद्देशअल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील संभाव्य निर्बंध व मर्यादा या मुलांचा मोबाईल फोन वापर आणि स्क्रीनटाईमचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी असल्याचे सरकारचे स्पष्टीकरण. अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वाईट व्यसनापासून दूर ठेवणे हा प्रमुख उद्देश. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) किंवा सोशल मीडियाचा वापर जबाबदारपणे केला जावा.
आंध्रात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर ९० दिवसांच्या आत बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने मुलांचा सोशल मीडिया वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले, ही बंदी १३ ऐवजी १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लागू करावी काय, यावर चर्चा सुरू आहे. तोवर १३ वर्षांपर्यंतची मुले कोणत्याही परिस्थिती सोशल मीडियावर वापरणार नाहीत यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. जगात सर्वप्रथम २०२५ साली ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली होती.
Web Summary : Karnataka and Andhra Pradesh plan to ban social media for children under 16 and 13 respectively. Concerns over mental health and digital addiction drive these restrictions, aiming to protect children from negative impacts.
Web Summary : कर्नाटक और आंध्र प्रदेश क्रमशः 16 और 13 वर्ष से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगाने की योजना बना रहे हैं। मानसिक स्वास्थ्य और डिजिटल लत की चिंताओं के कारण ये प्रतिबंध लगाए जा रहे हैं, जिसका उद्देश्य बच्चों को नकारात्मक प्रभावों से बचाना है।