शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 16:11 IST

येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली - जेएनयूची विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाच्या माजी नेत्या शेहला रशीद यांच्या विधानावरुन केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी आक्रमक प्रतिक्रिया घेतली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, सुरक्षा जवान आपल्या देशाची सुरक्षा करतात. त्यांच्याविरोधात चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. सोशल मीडियावर जम्मू काश्मीरबाबत खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. भारताची बरबादी पाहणाऱ्यांना या देशात जागा नाही. अशा लोकांना अथवा पक्षाला तुडवलं पाहिजे अशी भूमिका किशन रेड्डी यांनी घेतली आहे. 

किशन रेड्डी यांनी सांगितले की, ज्या लोकांना भारताची बरबादी हवी आहे. त्यांचे समर्थन करतात. अफजल गुरुबाबत बोलतात अशा लोकांना किंवा पक्षाला तुडवलं पाहिजे. अशा शक्तींसाठी भारतात कुठेही जागा नाही. भारताचे सैन्य आणि देशाचं रक्षण करणारे जवान यांच्याबाबत चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. मग ते पाकिस्तान असो अथवा कोणताही राजकीय पक्ष असं त्यांनी सांगितले. 

भारताच्या विरोधात कोणतंही वक्तव्य नको, अशा प्रकरणांवर येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडून जाणूनबुजून खोट्या अफवा पसरविल्या जातात. सीमेवर तणाव वाढविण्याचं काम केलं जातं असंही केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी शेहला रशीद हिने काश्मीरमधील परिस्थितीवरून केलेले आरोप भारतीय लष्कराने फेटाळून लावले होते.दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी  शेहरा रशीदविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच शेहला रशीद यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली होती.

शेहला रशीद ही स्वत: काश्मिरी असून, श्रीनगर येथील रहिवासी आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून ती सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी शेहला हिने एकापाठोपाठ एक खोटे ट्विट करून काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला होता. तसेच लष्कर आणि पोलीस घरांमध्ये घुसून स्थानिकांना त्रास देत आहेत. तसेच शोपियाँ येथे लष्कराने काही जणांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा आरोप शेहला रशीद यांनी केला होता. मात्र हे आरोप लष्कराने तात्काळ फेटाळून लावले आहेत.   

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर