शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 16:11 IST

येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली - जेएनयूची विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाच्या माजी नेत्या शेहला रशीद यांच्या विधानावरुन केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी आक्रमक प्रतिक्रिया घेतली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, सुरक्षा जवान आपल्या देशाची सुरक्षा करतात. त्यांच्याविरोधात चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. सोशल मीडियावर जम्मू काश्मीरबाबत खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. भारताची बरबादी पाहणाऱ्यांना या देशात जागा नाही. अशा लोकांना अथवा पक्षाला तुडवलं पाहिजे अशी भूमिका किशन रेड्डी यांनी घेतली आहे. 

किशन रेड्डी यांनी सांगितले की, ज्या लोकांना भारताची बरबादी हवी आहे. त्यांचे समर्थन करतात. अफजल गुरुबाबत बोलतात अशा लोकांना किंवा पक्षाला तुडवलं पाहिजे. अशा शक्तींसाठी भारतात कुठेही जागा नाही. भारताचे सैन्य आणि देशाचं रक्षण करणारे जवान यांच्याबाबत चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. मग ते पाकिस्तान असो अथवा कोणताही राजकीय पक्ष असं त्यांनी सांगितले. 

भारताच्या विरोधात कोणतंही वक्तव्य नको, अशा प्रकरणांवर येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडून जाणूनबुजून खोट्या अफवा पसरविल्या जातात. सीमेवर तणाव वाढविण्याचं काम केलं जातं असंही केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी शेहला रशीद हिने काश्मीरमधील परिस्थितीवरून केलेले आरोप भारतीय लष्कराने फेटाळून लावले होते.दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी  शेहरा रशीदविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच शेहला रशीद यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली होती.

शेहला रशीद ही स्वत: काश्मिरी असून, श्रीनगर येथील रहिवासी आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून ती सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी शेहला हिने एकापाठोपाठ एक खोटे ट्विट करून काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला होता. तसेच लष्कर आणि पोलीस घरांमध्ये घुसून स्थानिकांना त्रास देत आहेत. तसेच शोपियाँ येथे लष्कराने काही जणांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा आरोप शेहला रशीद यांनी केला होता. मात्र हे आरोप लष्कराने तात्काळ फेटाळून लावले आहेत.   

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर