शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 16:11 IST

येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली - जेएनयूची विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाच्या माजी नेत्या शेहला रशीद यांच्या विधानावरुन केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी आक्रमक प्रतिक्रिया घेतली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, सुरक्षा जवान आपल्या देशाची सुरक्षा करतात. त्यांच्याविरोधात चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. सोशल मीडियावर जम्मू काश्मीरबाबत खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. भारताची बरबादी पाहणाऱ्यांना या देशात जागा नाही. अशा लोकांना अथवा पक्षाला तुडवलं पाहिजे अशी भूमिका किशन रेड्डी यांनी घेतली आहे. 

किशन रेड्डी यांनी सांगितले की, ज्या लोकांना भारताची बरबादी हवी आहे. त्यांचे समर्थन करतात. अफजल गुरुबाबत बोलतात अशा लोकांना किंवा पक्षाला तुडवलं पाहिजे. अशा शक्तींसाठी भारतात कुठेही जागा नाही. भारताचे सैन्य आणि देशाचं रक्षण करणारे जवान यांच्याबाबत चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. मग ते पाकिस्तान असो अथवा कोणताही राजकीय पक्ष असं त्यांनी सांगितले. 

भारताच्या विरोधात कोणतंही वक्तव्य नको, अशा प्रकरणांवर येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडून जाणूनबुजून खोट्या अफवा पसरविल्या जातात. सीमेवर तणाव वाढविण्याचं काम केलं जातं असंही केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी शेहला रशीद हिने काश्मीरमधील परिस्थितीवरून केलेले आरोप भारतीय लष्कराने फेटाळून लावले होते.दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी  शेहरा रशीदविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच शेहला रशीद यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली होती.

शेहला रशीद ही स्वत: काश्मिरी असून, श्रीनगर येथील रहिवासी आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून ती सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी शेहला हिने एकापाठोपाठ एक खोटे ट्विट करून काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला होता. तसेच लष्कर आणि पोलीस घरांमध्ये घुसून स्थानिकांना त्रास देत आहेत. तसेच शोपियाँ येथे लष्कराने काही जणांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा आरोप शेहला रशीद यांनी केला होता. मात्र हे आरोप लष्कराने तात्काळ फेटाळून लावले आहेत.   

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर