शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

...म्हणून शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केली राष्ट्रवादीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:11 IST

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा...

ठळक मुद्देप्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं.या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत.या पुस्तकामध्ये शरद पवार यांची मंत्री, राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रणब मुखर्जी यांनी  प्रशंसा केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा खुलासा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्ताकात केला आहे. द कोअलिशन ईयर्स : 1996-2012 असं या पुस्तकाचं नाव असून त्यांनी 1999 साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नेमकं काय घडलं होतं हे यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत. यामध्ये शरद पवार हे काँग्रेसमधून का बाहेर पडले ? आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणी विरोध केला याबाबत माहिती सांगितली आहे.

पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा असल्यामुळेच शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले असावेत असा अंदाज प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात छापला आहे. मात्र यापेक्षाही आणखी एक महत्वाची गोष्ट होती ज्यामुळे पवार नाराज झाले होते. वाजपेयी सरकार अल्पमतात आल्यानंतर काँग्रेस सोनिया गांधी यांच्याऐवजी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी सांगेल असे पवारांना वाटत होते, मात्र असं न झाल्याने पवार नाराज झाले होते.

मुखर्जी यांनी लिहलंय की माझ्या माहितीनुसार त्यावेळी पवार हे लोकसभेमध्ये विरोधीपक्षनेते होते आणि त्यांना काँग्रेस पक्ष सत्तास्थापनेसाठी विचारेल असं वाटलं होतं. मात्र, सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांकडून सल्ला घेण्याऐवजी पी.शिवशंकर यांच्याकडून सल्ले घ्यायला सुरुवात केली होती. यामुळे नाराज झालेल्या पवारांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

1999 मध्ये काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या इटालियन ओरिजनचा मुद्दा काढल्याची आठवण मुखर्जींनी पुस्तकात सांगितली आहे. या पुस्तकामध्ये शरद पवार यांची मंत्री, राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रणब मुखर्जी यांनी  प्रशंसा केली आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेचा अनुभवही प्रणवदा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुंबईत आल्यावर मी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ नये असं मत सोनिया गांधींचे होते. पण शरद पवारांनी बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मला आग्रह केला. मी जर बाळासाहेबांची भेट घेतली नसती तर बाळासाहेब नाराज झाले असते आणि मला शिवसेनेचा पाठिंबाही मिळाला नसता असंही मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस