शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...तर दोन तासांत खुला केला असता रस्ता; पण भाजपलाच हवय 'शाहीन बाग' : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:57 IST

आम आदमी पक्ष सर्वात मोठा देशभक्त पक्ष आहे. आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आलो आहोत. जनतेसाठी आम्ही अनेकदा उपोषणे केल्याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली. 

नवी दिल्ली - नागरिकता संशोधन विधेयक आणि एनआरसी याला विरोध करत गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी गोळीबारही झाला आहे. हाच धागा पकडत हे आंदोलन भाजपला हव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अन्यथा आपण दोन तासांतच शाहीन बाग येथील रस्ता खुला केला असता, असंही केजरीवाल म्हणाले. 

अमित शाह यांच्यासारखे पावरफूल व्यक्ती शाहीन बागचा रस्ता काधीही खुला करू शकतात. मात्र ते खुला करू इच्छित नाही. त्यांना निवडणुकीत याचा फायदा होणार आहे. आमच्याकडे अधिकार असते तर दोन तासांत शाहीन बाग खुले केले असते. भाजपला संपूर्ण निवडणूक शाहीन बाग मुद्दावर लढवायची आहे. निवडणुकीनंतर हा मुद्दा समाप्त होईल, असा दावा केजरीवाल यांनी केला.

दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात नाही. त्यामुळे मी शाहीन बाग येथील रस्ता खुला करू शकत नाही. तसेच हे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आहे.  हा मुद्दा केंद्रसरकारच्या अखत्यारित आहे. तिथे जावून मी काय करणार, असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. तसेच शाहीन बाग येथे तीनवेळा गोळीबार झाला आहे. भाजपने निवडणुकीतील फायद्यासाठी राजधानीतील कायदा सुव्यवस्था पणाला लावल्याचा दावा, केजरीवाल यांनी केला.

दरम्यान आम आदमी पक्ष सर्वात मोठा देशभक्त पक्ष आहे. आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आलो आहोत. जनतेसाठी आम्ही अनेकदा उपोषणे केल्याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली.