शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

...तर दोन तासांत खुला केला असता रस्ता; पण भाजपलाच हवय 'शाहीन बाग' : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:57 IST

आम आदमी पक्ष सर्वात मोठा देशभक्त पक्ष आहे. आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आलो आहोत. जनतेसाठी आम्ही अनेकदा उपोषणे केल्याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली. 

नवी दिल्ली - नागरिकता संशोधन विधेयक आणि एनआरसी याला विरोध करत गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी गोळीबारही झाला आहे. हाच धागा पकडत हे आंदोलन भाजपला हव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अन्यथा आपण दोन तासांतच शाहीन बाग येथील रस्ता खुला केला असता, असंही केजरीवाल म्हणाले. 

अमित शाह यांच्यासारखे पावरफूल व्यक्ती शाहीन बागचा रस्ता काधीही खुला करू शकतात. मात्र ते खुला करू इच्छित नाही. त्यांना निवडणुकीत याचा फायदा होणार आहे. आमच्याकडे अधिकार असते तर दोन तासांत शाहीन बाग खुले केले असते. भाजपला संपूर्ण निवडणूक शाहीन बाग मुद्दावर लढवायची आहे. निवडणुकीनंतर हा मुद्दा समाप्त होईल, असा दावा केजरीवाल यांनी केला.

दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात नाही. त्यामुळे मी शाहीन बाग येथील रस्ता खुला करू शकत नाही. तसेच हे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आहे.  हा मुद्दा केंद्रसरकारच्या अखत्यारित आहे. तिथे जावून मी काय करणार, असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. तसेच शाहीन बाग येथे तीनवेळा गोळीबार झाला आहे. भाजपने निवडणुकीतील फायद्यासाठी राजधानीतील कायदा सुव्यवस्था पणाला लावल्याचा दावा, केजरीवाल यांनी केला.

दरम्यान आम आदमी पक्ष सर्वात मोठा देशभक्त पक्ष आहे. आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आलो आहोत. जनतेसाठी आम्ही अनेकदा उपोषणे केल्याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली.