शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कितना भी मारो, हम डरेंगे नहीं, लढेंगे!

By admin | Updated: April 25, 2016 04:31 IST

अविनाश थोरात, पुणे- ‘तुम मुझे थप्पड मारो, ट्रेन में मारो, प्लेन में मारो, हॉल में मारो, कुछ भी करो, लेकिन हम बोलेंगे.

अविनाश थोरात, पुणे-  ‘तुम मुझे थप्पड मारो, ट्रेन में मारो, प्लेन में मारो, हॉल में मारो, कुछ भी करो, लेकिन हम बोलेंगे. हमे डराने की कोशिश कीजा रही हैं, मगर हम डरेंगे नहीं, लढेंगे, असा विश्वास व्यक्त करीत देशाचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना पाठीशी असताना, नरेंद्र मोदी यांना आमच्या विचारधारेची भीती का वाटते, असा सवाल ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने केला.पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने ‘रोहित अ‍ॅक्ट व संविधान परिषद’ रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रमुख वक्ता म्हणून कन्हैया कुमार बोलत होता. आजच्या लेनिनजयंतीचा उल्लेख आणि शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारेचा गौरव करून देशातील उच्च-नीच व्यवस्था आणि जातीअंताची लढाई करताना आत्मसन्मानाची चळवळ उभी करणार असल्याचे त्याने सांगितले. धर्मनिरपेक्ष आणि समतामूलक देश हेच आपले अंतिम ध्येय असून, त्यासाठी प्राणही देण्याची तयारी आहे, असे तो म्हणाला.जातीयवाद, रूढीवादाच्या विरोधात लढणारे, मजुरांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांवर देशात हल्ले होत आहेत. देशात पदोपदी असमानता आहे. एकाच शाळेत काम करणाऱ्या दोन शिक्षकांना वेगवेगळे वेतन, पैसे असणाऱ्यांना बाटलीबंद पाणी आणि दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी बळी जात आहेत. ही कसली व्यवस्था आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान मतदानाचा हक्क दिला आहे, तर सुविधांचेही समान वाटप व्हायला हवे. आव्हान निर्मितीचे नाही, तर वितरणाचे आहे. खास वर्गाच्या लोकांना वेगळ्या सुविधा पुरविल्या जातात, असा आरोप त्याने केला.‘लढाई हैद्राबाद विद्यापीठातून सुरू झाली आहे, ती जेएनयू, फर्ग्युसन मार्गे मोठे रूप धारण करीत आहे. लोकांना भडकावून निवडणुका जिंकणे हा आमचा धंदा नाही. जितके रोहित मारले जातील, तितके पुन्हा उभे राहतील,’ असे तो म्हणाला.>पोलीस कोणाच्या सांगण्यावरून खोटे बोलताहेत?रविवारी सकाळी विमानात घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना कन्हैया कुमार म्हणाला, ‘माझ्यावर विमानात झालेला हल्ला हा सीटच्या भांडणातून झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीटसाठी भांडण हे विमानात होत नाही, तर ते रेल्वेच्या जनरल डब्यात होते, लोकलमध्ये होते. मात्र, आमच्या लढाईला विरोध करण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत. पोलीस कोणाच्या सांगण्यावरून खोटे बोलत आहेत? जे लोक माझ्यावर हल्ला करीत आहेत, त्यांना भडकविण्यात आले आहे. मात्र, ते आपलेच आहेत. ते निश्चित चांगल्या मार्गावर येतील.’किती खर्च करणार?आकाशवाणीवरील ‘मन की बात’ करण्यासाठी खर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त, तसेच धारावी आणि दिल्लीतील झोपडपट्टीवासियांशी ‘मन की बात’ करावी, असा खोचक सल्ला कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींना दिला. तुम्ही नाव बदला, आम्ही समाज बदलूदेशात नावे बदलण्याचे राजकारण केंद्रातील भाजपा सरकार करीत आहे, तुम्ही नावे बदलत राहा आम्ही समाज बदलण्याचे काम करू, असा टोला कन्हैया कुमारने लगावला. समतावादी आंबेडकर यांना नकोतबाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती सरकार साजरी करत आहे. मात्र, त्यांना समतावादी आंबेडकर आवडत नाहीत, अशी टीका करताना कन्हैया कुमार म्हणाला, ‘बाबासाहेबांनी जमिनींच्या समान वाटपाचा मुद्दा मांडला होता; कामगारांना न्याय हक्कांची मागणी केली होती; महिलांना संपत्तीचा अधिकार दिला होता, परंतु आताचे सरकार मुळातच महिलाविरोधी आहे.’ मान्यवरांची उपस्थितीज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार जयदेव गायकवाड व जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आदी उपस्थित होते.देशाचा झेंडा यांना बदलायचा आहेकोणी काय खावे, काय परिधान करावे, अगदी लग्न कोणाशी करावे, हे सरकार ठरवू लागले आहे. मात्र, आमचे घटनात्मक अधिकार हिरावू देणार नाही. भारतमातेची प्रतिमाही यांनी बदलली. पूर्वीची भारतमातेची प्रतिमा ही कृषिमूलक हातात शेतीचे अवजार घेणारी होती. तिला यांनी वाघावर बसविले. एक दिवस ते देशाचा झेंडाही बदलतील. यांना राष्ट्रवादाशी काही घेणे-देणे नाही. यांच्या राष्ट्रवादामागे ब्राह्मणवाद दडलेला आहे. याचा धोका खूप मोठा आहे, अशा शब्दांत त्याने घणाघाती टीका केली.