शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कितना भी मारो, हम डरेंगे नहीं, लढेंगे!

By admin | Updated: April 25, 2016 04:31 IST

अविनाश थोरात, पुणे- ‘तुम मुझे थप्पड मारो, ट्रेन में मारो, प्लेन में मारो, हॉल में मारो, कुछ भी करो, लेकिन हम बोलेंगे.

अविनाश थोरात, पुणे-  ‘तुम मुझे थप्पड मारो, ट्रेन में मारो, प्लेन में मारो, हॉल में मारो, कुछ भी करो, लेकिन हम बोलेंगे. हमे डराने की कोशिश कीजा रही हैं, मगर हम डरेंगे नहीं, लढेंगे, असा विश्वास व्यक्त करीत देशाचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना पाठीशी असताना, नरेंद्र मोदी यांना आमच्या विचारधारेची भीती का वाटते, असा सवाल ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने केला.पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने ‘रोहित अ‍ॅक्ट व संविधान परिषद’ रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रमुख वक्ता म्हणून कन्हैया कुमार बोलत होता. आजच्या लेनिनजयंतीचा उल्लेख आणि शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारेचा गौरव करून देशातील उच्च-नीच व्यवस्था आणि जातीअंताची लढाई करताना आत्मसन्मानाची चळवळ उभी करणार असल्याचे त्याने सांगितले. धर्मनिरपेक्ष आणि समतामूलक देश हेच आपले अंतिम ध्येय असून, त्यासाठी प्राणही देण्याची तयारी आहे, असे तो म्हणाला.जातीयवाद, रूढीवादाच्या विरोधात लढणारे, मजुरांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांवर देशात हल्ले होत आहेत. देशात पदोपदी असमानता आहे. एकाच शाळेत काम करणाऱ्या दोन शिक्षकांना वेगवेगळे वेतन, पैसे असणाऱ्यांना बाटलीबंद पाणी आणि दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी बळी जात आहेत. ही कसली व्यवस्था आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान मतदानाचा हक्क दिला आहे, तर सुविधांचेही समान वाटप व्हायला हवे. आव्हान निर्मितीचे नाही, तर वितरणाचे आहे. खास वर्गाच्या लोकांना वेगळ्या सुविधा पुरविल्या जातात, असा आरोप त्याने केला.‘लढाई हैद्राबाद विद्यापीठातून सुरू झाली आहे, ती जेएनयू, फर्ग्युसन मार्गे मोठे रूप धारण करीत आहे. लोकांना भडकावून निवडणुका जिंकणे हा आमचा धंदा नाही. जितके रोहित मारले जातील, तितके पुन्हा उभे राहतील,’ असे तो म्हणाला.>पोलीस कोणाच्या सांगण्यावरून खोटे बोलताहेत?रविवारी सकाळी विमानात घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना कन्हैया कुमार म्हणाला, ‘माझ्यावर विमानात झालेला हल्ला हा सीटच्या भांडणातून झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीटसाठी भांडण हे विमानात होत नाही, तर ते रेल्वेच्या जनरल डब्यात होते, लोकलमध्ये होते. मात्र, आमच्या लढाईला विरोध करण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत. पोलीस कोणाच्या सांगण्यावरून खोटे बोलत आहेत? जे लोक माझ्यावर हल्ला करीत आहेत, त्यांना भडकविण्यात आले आहे. मात्र, ते आपलेच आहेत. ते निश्चित चांगल्या मार्गावर येतील.’किती खर्च करणार?आकाशवाणीवरील ‘मन की बात’ करण्यासाठी खर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त, तसेच धारावी आणि दिल्लीतील झोपडपट्टीवासियांशी ‘मन की बात’ करावी, असा खोचक सल्ला कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींना दिला. तुम्ही नाव बदला, आम्ही समाज बदलूदेशात नावे बदलण्याचे राजकारण केंद्रातील भाजपा सरकार करीत आहे, तुम्ही नावे बदलत राहा आम्ही समाज बदलण्याचे काम करू, असा टोला कन्हैया कुमारने लगावला. समतावादी आंबेडकर यांना नकोतबाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती सरकार साजरी करत आहे. मात्र, त्यांना समतावादी आंबेडकर आवडत नाहीत, अशी टीका करताना कन्हैया कुमार म्हणाला, ‘बाबासाहेबांनी जमिनींच्या समान वाटपाचा मुद्दा मांडला होता; कामगारांना न्याय हक्कांची मागणी केली होती; महिलांना संपत्तीचा अधिकार दिला होता, परंतु आताचे सरकार मुळातच महिलाविरोधी आहे.’ मान्यवरांची उपस्थितीज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार जयदेव गायकवाड व जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आदी उपस्थित होते.देशाचा झेंडा यांना बदलायचा आहेकोणी काय खावे, काय परिधान करावे, अगदी लग्न कोणाशी करावे, हे सरकार ठरवू लागले आहे. मात्र, आमचे घटनात्मक अधिकार हिरावू देणार नाही. भारतमातेची प्रतिमाही यांनी बदलली. पूर्वीची भारतमातेची प्रतिमा ही कृषिमूलक हातात शेतीचे अवजार घेणारी होती. तिला यांनी वाघावर बसविले. एक दिवस ते देशाचा झेंडाही बदलतील. यांना राष्ट्रवादाशी काही घेणे-देणे नाही. यांच्या राष्ट्रवादामागे ब्राह्मणवाद दडलेला आहे. याचा धोका खूप मोठा आहे, अशा शब्दांत त्याने घणाघाती टीका केली.