शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 14:01 IST

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झालं.

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी संसेदत दिल्ली सेवा विधेयकाच्या चर्चेदरम्यान सहभाग घेत आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी, आठवलेंनी आपल्या स्टाईलमध्ये या विधेयकाचं समर्थन करताना विरोधकांवर टीका केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचं कौतुकही केलं. आठवलेंनी कविता म्हणत राज्यसभेत या विधेयकाला आपलं समर्थन दिलं.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झालं. अनेक वादविवाद, चर्चा आणि गदारोळादरम्यान आज या विधेयकावर राज्यसभेमध्ये मतदान झालं. तेव्हा हे विधेयक पारित करण्याच्या बाजूने तब्बल १३१ सदस्यांनी मत दिलं. तर या विधेयकाविरोधात १०२ मते पडली. या विधेयकास रामदास आठवेलांनी कवितेच्या माध्यमातून समर्थन दिलं. त्यावेळी, भाषण करताना त्यांनी आम आदमी पक्षाला टोला लगावला.

अमित भाईंका इतना अच्छा आ गया है बिललेकीन सामने वालों को हो रहा है फील

नरेंद्र मोदीजीं के पास है, बहुत अच्छी वीललेकीन दिल्ली मे हो रही है दारु के ठेके की डील

नरेद्र मोदी और अमित शहा की अच्छी जम गई जोडीफिर काँग्रेस और आपवालों की कैसे आगे जाएगी गाडी

नरेंद्र मोदीजी जानते है जनता की नाडीइसलिए बढाई है, मैने अपनी दाढी

नरेंद्र मोदी बाबासाहेबांचे संविधान बदलणारे नाहीत, ते संविधानाची रक्षा करत आहेत. दिल्ली सेवा विधेयक हे भारताच्या संविधानाची रक्षा करणारे बिल आहे. त्यामुळे, माझ्या रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने मी या विधेयकाचे समर्थन करतो आणि विरोधकांनीही या विधेयकाचे समर्थन केले पाहिजे, असे रामदास आठवलेंनी म्हटले. 

संजय राऊत यांचा विरोध, सरकारवर निशाणा

दिल्लीत विधानसभा आहे, दिल्लीतील लोकांनी निवडून दिलेलं सरकार दिल्लीत आहे. दिल्लीचे मुख्य सचिव किंवा एलजी मतं मागायला गेले नव्हते. लोकांनी त्यांना मत नाही दिले. मत मागायले गेले होते केजरीवाल किंवा मुख्यमंत्री किंवा एखादं सरकार, नेता. दिल्लीच्या विधानसभेत तुमचं ५ आमदार नाहीत, आजपर्यंत ६ वेळा तुम्ही दिल्लीची निवडणूक पराभूत झाला आहात. पण, दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, प. बंगाल असेल किंवा तामिळनाडू असेल तुम्हा ताबा घेऊ इच्छिता, असे म्हणत राऊत यांनी दिल्ली सेवा विधेयकातील चर्चेदरम्यान मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, मोदी सरकारला लोकशाही मान्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच, तुमच्याकडून सर्वकाही विकलं जात असल्याचं सांगताना त्यांनी काव्यपंक्तीही म्हटल्या.  

मत पुँछो के इस दौर मे क्या क्या नही बिकाआपके आँखो की शरम तक आपने बेच दी

कवि गोपालदास यांच्या या काव्यपंक्ती वाचून दाखवत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच, तुमच्या डोळ्यात लाजसुद्धा उरली नाही, असेही राऊत यांनी म्हटले.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेdelhiदिल्लीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन