शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...तर २०२४ची निवडणूक भाजपसाठी कठीण; शशी थरूर यांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:21 IST

काँग्रेस नेते शशी थरूर यांचे वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकांत विरोधकांनी एकजूट दाखवून एकास एक उमेदवार दिला तर ही निवडणूक भाजपला अतिशय कठीण जाईल, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने अनेक राज्यांत मोठा विजय मिळविला होता. त्या इतिहासाची पुनरावृत्ती भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांत करता येणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भाजपप्रमाणेच काँग्रेस हादेखील राष्ट्रीय पक्ष आहे. देशाच्या काही भागांमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसचे बळ अधिक आहे. काँग्रेसला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे अस्तित्व प्रत्येक राज्यात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी किंवा सरकार स्थापन करताना कोणालाही काँग्रेसचा विचार हा करावाच लागेल. २०१९नंतर देशाच्या राजकीय स्थितीत खूप बदल झाले आहेत. बिहारमध्ये सत्तेत भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू)ने आता वेगळ्याच पक्षांशी हातमिळवणी केली आहे. देशात प्रस्थापित सरकारविरोधी लाट असून, त्याचा तडाखा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बसेल, असे ते म्हणाले.

‘भारत जोडो’ने काँग्रेसला आत्मविश्वास दिला’भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा संपूर्णपणे बदलली इतकेच नव्हे तर या यात्रेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आत्मविश्वास प्रदान केला, असेही काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांनी सांगितले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपा