शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

...तर २०२४ची निवडणूक भाजपसाठी कठीण; शशी थरूर यांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:21 IST

काँग्रेस नेते शशी थरूर यांचे वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकांत विरोधकांनी एकजूट दाखवून एकास एक उमेदवार दिला तर ही निवडणूक भाजपला अतिशय कठीण जाईल, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने अनेक राज्यांत मोठा विजय मिळविला होता. त्या इतिहासाची पुनरावृत्ती भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांत करता येणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भाजपप्रमाणेच काँग्रेस हादेखील राष्ट्रीय पक्ष आहे. देशाच्या काही भागांमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसचे बळ अधिक आहे. काँग्रेसला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे अस्तित्व प्रत्येक राज्यात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी किंवा सरकार स्थापन करताना कोणालाही काँग्रेसचा विचार हा करावाच लागेल. २०१९नंतर देशाच्या राजकीय स्थितीत खूप बदल झाले आहेत. बिहारमध्ये सत्तेत भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू)ने आता वेगळ्याच पक्षांशी हातमिळवणी केली आहे. देशात प्रस्थापित सरकारविरोधी लाट असून, त्याचा तडाखा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बसेल, असे ते म्हणाले.

‘भारत जोडो’ने काँग्रेसला आत्मविश्वास दिला’भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा संपूर्णपणे बदलली इतकेच नव्हे तर या यात्रेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आत्मविश्वास प्रदान केला, असेही काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांनी सांगितले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपा