शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा क्रूर खेळ! सर्पदशांने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणाचा सर्पदंशानेच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 10:39 IST

सर्पदंशाने भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा ही साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 72 तासांत एकाच घरातील 3 जणांना साप चावला आणि यामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्पदंशाने भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा ही साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झोपेत असताना सापाने त्यांना दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

ललिया पोलीस ठाण्याचे अधिकारी राधा रमन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, भवनियापूर गावातील 38 वर्षीय अरविंद मिश्रा याला दोन ऑगस्ट रोजी साप चावला. यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने दुसऱ्या ठिकाणी रेफर केलं. याच दरम्यान अरविंद मिश्राचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ गोविंद मिश्रा अंत्यविधीसाठी गावात आला होता. 

भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला गोविंद आणि त्याचे नातेवाईक चंद्रशेखर पांडे घरी थांबले होते. झोपेत असताना गोविंदला साप चावला आणि त्यांचा एक नातेवाईकदेखील त्या खोलीत झोपला होता. त्यालाही सापाने दंश केला. गोविंदला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे त्याची प्रकृती गंभीर होती अन् नंतर त्याचा मृत्यू झाला. तर नातेवाईक गंभीर असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आहे. स्थानिक आमदार कैलाश शुक्ला यांनी कुटुंबाची भेट घेतली असून, मदतीचं आश्वासन दिलं आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बलरामपूर येथील दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश