शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

प्रवाशांसाठी खूशखबर! धुक्यामुळे ट्रेन लेट झाल्यास SMS वर मिळणार माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 10:04 IST

धुक्यामुळे अनेकदा ट्रेन उशिराने धावत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.

ठळक मुद्देधुक्यामुळे ट्रेनला उशिरा झाला तर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना त्याची माहिती मिळणार. प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धुक्यामुळे लेट होणाऱ्या ट्रेन्सच्या संख्येत घट झाली आहे.

नवी दिल्ली - धुक्यामुळे अनेकदा ट्रेन उशिराने धावत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता धुक्यामुळे ट्रेनला उशिरा झाला तर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना त्याची माहिती मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी फोनवर एसएमएसच्या माध्यमातून ट्रेनचं लोकेशन सांगितलं जाईल. तसेच किती वेळात ट्रेन स्थानकात पोहचू शकते याबाबतही माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

थंडीच्या दिवसात धुक्यामुळे ट्रेन या लेट होत असतात. मात्र याचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो. यंदा रेल्वे प्रशासनाने याची खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धुक्यामुळे लेट होणाऱ्या ट्रेन्सच्या संख्येत घट झाली आहे. यंदा 15 टक्के सुधारणा झाली असून 71 टक्के ट्रेन्स या आपल्या वेळेवरचं स्थानकात दाखल झाल्या आहेत. तसेच प्राथमिक सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या वेळेत बऱ्याच अंशी सुधारणा झाली आहे. ट्रेन आपल्या वेळेत स्थानकात पोहतच असल्याने ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच थंडीच्या दिवसात धुक्याचा फटका रेल्वे सेवेला बसू नये यासाठी उत्तम खबरदारी घेण्यात येत आहे. साधारणत: 15 डिसेंबरनंतर रेल्वेला धुक्याचा फटका बसण्यास सुरुवात होते. मात्र यंदा उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रेनमध्ये धुक्यापासून वाचण्यासाठी फॉग सेफ्टी डिव्हाईस लावण्यात आले आहे. लोको पायलटला फॉग सेफ्टी डिव्हाईसच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिज्युअल क्यू सिग्नल देतील. ते सिग्नल जवळ येतच ट्रेनचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे डिव्हाईस काम करणार आहे. 

प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात. अधिकृत रेल्वे एजंटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे कारण आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर प्रवाशांना रिफंड मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसी ओटीपी आधारित प्रणाली आणली आहे. प्रवाशांना टिकीट कॅन्सल करण्यासाठी आयआरसीटीसीच्याद्वारे देण्यात आलेल्या पासवर्डच्या मदतीने रिफंड मिळण्याची सुविधा देण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) ही सुविधा केवळ अधिकृत एजेंटच्या माध्यमातून बूक करण्यात येणाऱ्या ई-तिकीटांवर लागू असणार असल्याची माहिती दिली आहे. ओटीपी आधारित रिफंड प्रक्रिया ही प्रवाशांच्या फायद्याची आहे. त्याचबरोबर यामुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणार आहे. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे