शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी वाजविल्या शिट्ट्या, विद्यार्थी झाले आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 12:58 IST

स्मृती इराणी यांचं एक वेगळं रूप सगळ्यांना पाहायला मिळालं.

ठळक मुद्देस्मृती इराणी यांचं एक वेगळं रूप सगळ्यांना पाहायला मिळालं.कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चक्क शिट्टी वाजवली.

नवी दिल्ली- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी त्यांच्या दमदार भाषणाने किंवा सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसंच स्मृती इराणी यांच्या अभिनय कौशल्याचीही सगळ्यांना माहिती आहे. पण दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात स्मृती इराणी यांचं एक वेगळं रूप सगळ्यांना पाहायला मिळालं. मंगळवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फ‌ॅशन टेक्नॉलॉजीच्या (एनआयएफटी) पदवीदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चक्क शिट्टी वाजवली. बिनधास्तपणे तोंडात बोट घालून जोरदार शिट्ट्या वाजवणाऱ्या स्मृती इराणींना पाहून विद्यार्थ्यांना क्षणभर आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनीही शिट्ट्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.

एनआयएफटी संस्थेचा पदवीदान सोहळा मंगळवारी स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडला. इराणी यांनी यावेळी विद्यार्थांना पदवी देऊन भाषण केलं. या भाषणात त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. एका विद्यार्थ्यानं फॅशनमधील तंगालिया या दुर्मिळ प्रकाराचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. काळाच्या पडद्या आड जात असलेले हे कलाप्रकार वाचविण्यासाठी आपण पुढे आलात तर मला अभिमान वाटेल, असं यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या.

राहुल गांधीच्या ट्विटला दिलं होतं शरोशायरीत उत्तरकाही दिवसांपूर्वीच स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला शेरोशायरीच्या अंदाजात उत्तर दिलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. या टीकेला स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं. कवी दुष्यंत कुमार यांच्या “भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली मे जेरे-बहस ये मुद्दा” या ओळी ट्विट केल्या होत्या. जागतिक भूक निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर घसरला. यानंतर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ट्विट केलं . ‘ऐ सत्ता की भूख-सब्र कर, आँकडे साथ नहीं तो क्या खुदगर्जों को जमा कर, मुल्क की बदनामी का शोर तो मचा ही लेंगे’ असं ट्विट करून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं होतं.