शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

By admin | Updated: February 19, 2016 00:40 IST

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे
आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

स्मार्ट ग्राम निर्माण करण्यासाठी प्रशासनाचे सक्षमीकरण, विविध कामांची अंमलबजावणी, पर्यावरण संरक्षण, वनीकरण, स्वच्छता, जलसंधारण, आरोग्य या मूलभूत सुविधांनीयुक्त व आरोग्याने परिपूर्ण अशी गावे निर्माण झाली पाहिजेत. यापैकी प्रत्येक मुद्यावर आमदार शिंदे यांनी दिलखुलास विचार मांडले.
स्वच्छता :
स्वच्छता हा आरोग्याचा पाया आहे, या दृष्टीने प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे. प्रत्येक कुटुंबात शौचालय असले पाहिजे व त्याचा वापर झाला पाहिजे. जेथे जागेचा प्रश्न असेल तेथे पाच-सहा कुटुंबात एक शौचालय बांधले पाहिजे. ज्या गावांना निर्मलग्राम पुरस्कार मिळालेत, हागणदारीमुक्त गावाची घोषणा झाली तेथे आजही 30 टक्के नागरिक उघड्यावर शौचालयास जातात ही स्थिती बदलली पाहिजे.
प्रत्येकाने आपले अंगण व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जागा असेल तेथे झाडे लावावीत.
ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहेत; परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता आहे. डॉक्टरांच्या नेमणुका केल्या पाहिजेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात रक्त, लघवी व इतर तपासण्यासाठी लॅब असली पाहिजे. पुरेसे कर्मचारी असावेत. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण स्त्रियांच्या बाळंतपणासाठी सुसज्ज अशी सोय असावी व अद्ययावत ऑपरेशन थिएटर असावे.
ग्रामपंचायत प्रशासन पारदर्शी व गतिमान असले पाहिजे, तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी एकच व्यक्ती असली पाहिजे. यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. ग्राम पातळीवरील कर्मचार्‍यांनी 11 ते 5 कार्यालयात थांबले पाहिजे. ग्रामसेवकास स्थानिक पातळीवरील सर्व दाखले देण्याचे अधिकार असले पाहिजेत. सामान्य शेतकर्‍यास त्रास न देता खरेदीनंतर वेळेत नोंदी लावल्या पाहिजेत.
सतत पडणारा दुष्काळ व पाणी टंचाई हा ग्रामीण भागातील गंभीर प्रश्न बनला आहे. यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत जिरवला पाहिजे. ओढे-नाले यांचे खोलीकरण करून पाणी अडवले पाहिजे. गावात पाझर तलाव, नाला बंडिंगची कामे मोठय़ा प्रमाणात झाली पाहिजेत. शेतीसाठी आता प्रवाही पद्धतीने पाणी देणे परवडणारे नाही. त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शेती ही लोकचळवळ बनली पाहिजे, संपूर्ण गाव ठिबक सिंचन केलेले असावे.
लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी आर.ओ. प्लांट उभारून माफक किमतीत ते नागरिकांना दिले तर आरोग्याचा प्रश्न राहणार नाही.
गावात व परिसरात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. धुरमुक्त गाव संकल्पना राबवून चुलीचा वापर न करता गॅसचा वापर केला पाहिजे. रोजगार हमीच्या कामाद्वारे वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक शाळेतील गुणवत्ता वाढली पाहिजे. अंगणवाडी, प्राथमिक शिक्षणाबरोबरच प्रत्येक गावात उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असली पाहिजे. विशेषकरून सायन्स शाखेची गरज आहे. शासनाने शिक्षण कर माफ केला पाहिजे, त्यामुळे पीकपाण्याची नोंद अचूक होईल. खोटी माहिती कोणी देणार नाही व त्यामुळे शासनास विविध योजनांचे अचूक नियोजन करता येईल.
शासनाच्या विविध योजना सुलभ होण्यासाठी व जनतेला त्रास होऊ नये म्हणून आलेल्या प्रत्येक अर्जाची संबंधित कार्यालयात नोंद असली पाहिजे. आलेल्या अर्जांचा निपटारा वेळेत केला पाहिजे.
संजय गांधी निराधार योजना, र्शावणबाळ योजना, बी.पी.एल. यासारख्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी एनजीओचा वापर केला पाहिजे.
‘स्मार्ट ग्राम’ कल्पनेबाबत विस्ताराने बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, गावपातळीवर जमिनीच्या बांधावरून व गावातील रस्त्यावरून सतत भांडणे होत असतात, त्यामुळे गावची शांतता व सलोखा धोक्यात येत असते. यासाठी शेतातील बांध व रस्ते यांची मोजणी करून खुणा करून दिल्यास भांडणे होणार नाहीत.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गावठाण वाढवून घेतले पाहिजे व जेथे अतिक्रमण करून घरे बांधली आहेत ती नियमित केली पाहिजेत, जेणेकरून गरीब माणसे विस्थापित होणार नाहीत.
गावपातळीवर या सर्व गोष्टी करत असताना फक्त शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून व लोकांना विश्वासात घेऊन पारदर्शी कारभार केला तर गावे स्मार्ट होतील.