शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ंअकरा शहरे होणार स्मार्ट-पान १

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

अकरा शहरे होणार स्मार्ट !

अकरा शहरे होणार स्मार्ट !
-स्मार्ट सिटी अभियान: मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, सोलापूर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीचा समावेश

मुंबई- केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद या अकरा शहरांची निवड करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
्नराज्य मंत्रिमंडळाच्या २३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत ही योजना महाराष्ट्रात अमलात आणण्यास मान्यता देण्यात आली. देशातील १०० शहरांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीकरिता हे अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केंद्राकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांची निवड करायची होती. परंतु प्रत्यक्ष़ात अकरा शहरांची निवड केली गेली आहे. याकरिता एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ३६ शहरांमध्ये स्पर्धा होती. या योजनेत शहरांमधील प्रमुख नागरी समस्यांचे निवारण करण्याकरिता केंद्र सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांत देण्यात येणार असून उर्वरित ५०० कोटींचा निधी राज्य सरकार व महापालिकेने उभा करायचा आहे. त्यामुळे ज्या शहरांचा या योजनेत समावेश केला जाईल त्यांना २५० कोटी रुपयांची तजवीज करावी लागणार आहे. परिणामी लोकसंख्येच्या निकषानुसार योजनेस पात्र असणारी शहरे आर्थिक निकषावर मागे पडली.
या अभियानाच्या अंमलबजावणीकरिता विशेष हेतू यंत्रणा (स्पेशल पर्पज व्हेकल) स्थापन करण्यात येईल. तसेच स्मार्ट सिटी सल्लागार फोरमची स्थापना करण्यात येईल. त्या माध्यमातून विविध घटकांचा अभियानात समावेश केला जाणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती या अभियावर देखरेख करील व नगरविकास विभागाचे सचिव (२) या अभियानाचे संचालक म्हणून काम करतील.
पायाभूत सुविधा पुरवून शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन विद्यमान शहरांभोवती नवी शहरे विकसीत करणे, मिश्र जमीन वापर, सर्व रहिवाशांना घरांची संधी उपलब्ध करून देणे, नैसर्गिक स्त्रोतांचा र्‍हास थांबवण्याकरिता शहरातील गर्दी-वायू प्रदूषण कमी करणे, मोकळ्या जागांचे जतन व विकास, वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध करणे आदी उद्दीष्टे गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अभियानात सहभागी शहरांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा करणे, आश्वासक विद्युत पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रभावी दळणवळण, नागरी गरिबांना परवडणार्‍या घरांची उपलब्धता, सक्षम माहिती-तंत्रज्ञान व डिजिटलायझेशनस, ई-गव्हर्नन्स, महिला व बालकांची सुरक्षा आदी पायाभूत सुविधा पुरवणे अत्यावश्यक केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
.........................
ठाणे जिल्‘ातून तीन महापालिका!
स्मार्ट सिटी अभियानासाठी निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये एकट्या ठाणे जिल्हयातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली अशा तीन शहरांची निवड करण्यात आली आहे.
......................
पुणे जिल्‘ातून दोन!
पुणे जिल्‘ातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दहाच शहरे निवडायची असताना प्रत्यक्षात शहरांची संख्या अकरा झाली आहे. वाढीव संख्या दिसू नये म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे एकच शहर दाखविण्यात आले!
...............................
अशी होती निवड प्रक्रिया
केंद्र सरकारने १०० गुणांचा आणि १३ प्रश्नांचा एक पेपर १ लाखाच्या वरती लोकसंख्या असलेल्या शहरांना पाठविण्यात आला. राज्यात अशी ३७ शहरं आहेत. ज्यात २६ महानगरपालिका आहेत तर ११ अ वर्ग नगरपालिका आहेत.
केंद्र सरकारने विचारलेल्या १३ प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेसोबत राज्य सरकार देखील स्वत:ची एक प्रश्नपत्रिका पाठविली होती. ३१ जुलै ही प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत होती. किती शहरांचे प्रस्ताव आले होते, हे सरकारने जाहीर केलेले नाही.
............................
२०० कोटींचे आर्थिक गणित
निवड झालेल्या शहरांना केंद्र सरकार दरवर्षी १०० कोटी आणि राज्य सरकार ५० कोटी देणार आहे. शिवाय, त्या शहरांनी स्वत: ५० कोटी उभे करायचे आहेत. असे २०० कोटी रुपये उभे राहतील.