शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

"गुलामगिरीत वारसा जळून नष्ट झाला, पण..."; पंतप्रधान मोदींच्या हस्ते संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 08:01 IST

‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.'

नवी दिल्ली : ‘गुलामगिरीच्या काळात अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली; परंतु, स्वातंत्र्यानंतर त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत,’ असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. 

मोदी म्हणाले, ‘शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडाने भारताचे असे नुकसान केले की आपला बराचसा लिखित आणि अलिखित वारसा नष्ट झाला. गुलामगिरीच्या काळात आपली अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली. हे केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे आणि मानवजातीचे नुकसान होते.’

‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. म्हणूनच भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात घोषणा केलेल्या ‘पंचतत्त्वां’ची घोषणा केली आहे आणि त्यातील मुख्य म्हणजे आपल्या वारशाचा अभिमान. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ४७ वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘आभासी दर्शन’ सेवेचेही उद्घाटन -पंतप्रधानांनी नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमधील राष्ट्रीय संग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल वॉकथ्रू’चे (आभासी दर्शन) उद्घाटन केले. त्यांनी भारतीय संग्रहालयांची निर्देशिक, कर्तव्य पथचा ‘पॉकेट मॅप’, म्युझियम कार्डचे प्रकाशनही केले. 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा