शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:38 IST

केंद्राची सूचना; आंतरराज्य प्रवास सुलभ हवा

नवी दिल्ली : देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा पर्यटक, प्रवाशांना आंतरराज्य प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची सक्ती करू नये अशी सूचना केंद्रीय पर्यटन विभागाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांना काही राज्यांमध्ये जाताना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागत नाही. मात्र मुंबई, पुणे, चेन्नई येथून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांना अद्यापही आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.कर्नाटक, गोवा, छत्तीसगढ या राज्यांतही अशीच बंधने आहेत. केंद्रीय पर्यटन खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांसाठी सर्व राज्यांनी एकाच प्रकारची नियमावली अंमलात आणावी.  आंतरराज्य प्रवास करणाऱ्या पर्यटकांना कोरोना काळात विविध राज्यांतील वेगवेगळ्या नियमांमुळे जो त्रास सहन करावा लागतो, त्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पुन्हा आरटी-पीसीआर करायला न लावता महाराष्ट्र, सिक्कीम ही राज्ये आपल्या हद्दीत प्रवेश देत आहेत.समान नियम लागू कराकोरोना काळात देशातील सर्व राज्यांनी प्रवेशाबाबतचे समान नियम तयार केले तर पर्यटकांना, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही असे केंद्र सरकारला वाटते. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे. तसेच सर्व राज्यांसाठी समान नियम तयार करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खाते, नागरी हवाई वाहतूक खाते यांची एक संयुक्त बैठक लवकरच होणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या