शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

आसाममध्ये गेलेले तृणमूलचे नेते परतले माघारी, विमानतळावरच काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 16:44 IST

तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.

सिल्चर- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन तृणमूल काँग्रेसने गेले तीन दिवस अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणं सुरु केलं तर त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी आसामची वाट धरली. मात्र सिल्चरमध्ये विमानतळावर या शिष्टमंडळाला अडवण्यात आले व रात्रभर तेथेच रोखून धरण्यात आलं होतं.

तृणमूल काँग्रेस पक्षाचे सहा नेते आज सकाळी आसाममधून पश्चिम बंगालला जायला निघाले आणि दोन नेते दुपारी दिल्लीला गेले. खासदार अर्पिता घोष आणि ममता बाल ठाकुरिया आसासममधून दिल्लीला गेल्या. एनआरसीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर आसासममधील बंगालीबहुल सिल्चरमधील परिस्थिती काय आहे हे पाहाण्यासाठी तृणमूलचे आठ सदस्य तेथे गेले होते. मात्र त्यांना विमानतळावरच रोखून धरण्यात आले. सिल्चरमध्ये प्रवेश करण्यास मनाई केल्यामुळे त्यांना विमानतळावरच बसून राहावे लागले. अखेर हे सदस्य माघारी फिरले. 

या शिष्टमंडळातील सदस्य आणि खासदार शेखर रे यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला तसेच शिष्टमंडळातील महिलांशी गैरवर्तन केले असेही ते म्हणाले. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी शेखर रे यांच्या म्हणण्याला दुजोरा देत तसाच आरोप केला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार तृणमूलच्या सदस्यांनीच गैरवर्तनाला सुरुवात केली आणि पोलिसांना जखमी केले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबद्दल केंद्र सरकार व आसाम सरकारवर टीका करत हा सगळा राजकीय बदला घेण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. आसाम सरकार केंद्रसरकारप्रमाणे असं का वागत आहे, भाजपा शक्तीचा वापर करत आहे असा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी आपल्या जुन्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत यू टर्न घेतला असला तरी तृणमूलमध्ये मात्र धुसफूस सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAssamआसाम