शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आसाममध्ये गेलेले तृणमूलचे नेते परतले माघारी, विमानतळावरच काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 16:44 IST

तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.

सिल्चर- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन तृणमूल काँग्रेसने गेले तीन दिवस अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणं सुरु केलं तर त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी आसामची वाट धरली. मात्र सिल्चरमध्ये विमानतळावर या शिष्टमंडळाला अडवण्यात आले व रात्रभर तेथेच रोखून धरण्यात आलं होतं.

तृणमूल काँग्रेस पक्षाचे सहा नेते आज सकाळी आसाममधून पश्चिम बंगालला जायला निघाले आणि दोन नेते दुपारी दिल्लीला गेले. खासदार अर्पिता घोष आणि ममता बाल ठाकुरिया आसासममधून दिल्लीला गेल्या. एनआरसीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर आसासममधील बंगालीबहुल सिल्चरमधील परिस्थिती काय आहे हे पाहाण्यासाठी तृणमूलचे आठ सदस्य तेथे गेले होते. मात्र त्यांना विमानतळावरच रोखून धरण्यात आले. सिल्चरमध्ये प्रवेश करण्यास मनाई केल्यामुळे त्यांना विमानतळावरच बसून राहावे लागले. अखेर हे सदस्य माघारी फिरले. 

या शिष्टमंडळातील सदस्य आणि खासदार शेखर रे यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला तसेच शिष्टमंडळातील महिलांशी गैरवर्तन केले असेही ते म्हणाले. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी शेखर रे यांच्या म्हणण्याला दुजोरा देत तसाच आरोप केला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार तृणमूलच्या सदस्यांनीच गैरवर्तनाला सुरुवात केली आणि पोलिसांना जखमी केले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबद्दल केंद्र सरकार व आसाम सरकारवर टीका करत हा सगळा राजकीय बदला घेण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. आसाम सरकार केंद्रसरकारप्रमाणे असं का वागत आहे, भाजपा शक्तीचा वापर करत आहे असा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी आपल्या जुन्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत यू टर्न घेतला असला तरी तृणमूलमध्ये मात्र धुसफूस सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAssamआसाम