शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

आसाममध्ये गेलेले तृणमूलचे नेते परतले माघारी, विमानतळावरच काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 16:44 IST

तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.

सिल्चर- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन तृणमूल काँग्रेसने गेले तीन दिवस अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणं सुरु केलं तर त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी आसामची वाट धरली. मात्र सिल्चरमध्ये विमानतळावर या शिष्टमंडळाला अडवण्यात आले व रात्रभर तेथेच रोखून धरण्यात आलं होतं.

तृणमूल काँग्रेस पक्षाचे सहा नेते आज सकाळी आसाममधून पश्चिम बंगालला जायला निघाले आणि दोन नेते दुपारी दिल्लीला गेले. खासदार अर्पिता घोष आणि ममता बाल ठाकुरिया आसासममधून दिल्लीला गेल्या. एनआरसीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर आसासममधील बंगालीबहुल सिल्चरमधील परिस्थिती काय आहे हे पाहाण्यासाठी तृणमूलचे आठ सदस्य तेथे गेले होते. मात्र त्यांना विमानतळावरच रोखून धरण्यात आले. सिल्चरमध्ये प्रवेश करण्यास मनाई केल्यामुळे त्यांना विमानतळावरच बसून राहावे लागले. अखेर हे सदस्य माघारी फिरले. 

या शिष्टमंडळातील सदस्य आणि खासदार शेखर रे यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला तसेच शिष्टमंडळातील महिलांशी गैरवर्तन केले असेही ते म्हणाले. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी शेखर रे यांच्या म्हणण्याला दुजोरा देत तसाच आरोप केला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार तृणमूलच्या सदस्यांनीच गैरवर्तनाला सुरुवात केली आणि पोलिसांना जखमी केले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबद्दल केंद्र सरकार व आसाम सरकारवर टीका करत हा सगळा राजकीय बदला घेण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. आसाम सरकार केंद्रसरकारप्रमाणे असं का वागत आहे, भाजपा शक्तीचा वापर करत आहे असा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी आपल्या जुन्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत यू टर्न घेतला असला तरी तृणमूलमध्ये मात्र धुसफूस सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAssamआसाम