शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टीएमसीच्या 6 आमदारांची बंडखोरी, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा मोठा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 18:33 IST

तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत.

नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय जनता पार्टीनं उत्तर-पूर्वेकडच्या राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली असतानाच त्रिपुरा विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकही आमदार नसलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजपाला अचानक 6 आमदारांचं बळ मिळालं आहे.भाजपा आता त्रिपुरा विधानसभेतील प्रमुख विरोध पक्ष बनला आहे. तिस-या आणि शेवटच्या स्थानी असलेल्या काँग्रेसजवळ फक्त 4 आमदार आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे सुदीप रॉय बर्मन, आशिष कुमार साहा, दीबा चंद्र हंगखावस, बिस्व बंधू सेन, प्रांजित सिंह रॉय आणि दिलीप सरकार यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. 2013मधल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांनी 60 पैकी 50 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यावेळी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या होत्या, तर टीएमसीला साधं खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र 2016मधली पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक डावे आणि काँग्रेसनं एकत्र मिळून लढली. त्यावेळी या 6 आमदारांनी डाव्यांची साथ सोडत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे पसंत केले होते. मात्र तृणमूल काँग्रेसनंही गेल्या काही दिवसांपूर्वीच या 6 आमदारांची पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणास्तव पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे हे 6 आमदार भाजपामध्ये दाखल झाले असून, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.एखाद्या विधानसभेत पक्षाकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ असताना इतर आमदारांनी बंडखोरी केल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. जर एखाद दुस-या आमदारानं असं केलं असतं तर त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं असतं. मात्र काँग्रेसमध्येच असताना 6 आमदारांच्या एका गटानं बंडखोरी केली होती. आता त्याच 6 आमदारांनी भाजपामध्ये जाणं पसंत केलं आहे. एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसनं या आमदारांची हकालपट्टी केली.येत्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीआधीच हे 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाल्यानं भाजपाला त्रिपुरात बळ मिळालं आहे. या 6 आमदारांना तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आणण्याचं श्रेय आसामचे भाजपाचे नेते आणि शिक्षा मंत्री हिमंत विश्वकर्मा यांना जातं. भाजपा त्रिपुरात कधीच कोणताही जागा जिंकू शकलेली नाही. तसेच तृणमूल काँग्रेसचे इतरही पदाधिकारी लवकरच भाजपामध्ये सहभागी होतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.