शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

टीएमसीच्या 6 आमदारांची बंडखोरी, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा मोठा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 18:33 IST

तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत.

नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय जनता पार्टीनं उत्तर-पूर्वेकडच्या राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली असतानाच त्रिपुरा विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकही आमदार नसलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजपाला अचानक 6 आमदारांचं बळ मिळालं आहे.भाजपा आता त्रिपुरा विधानसभेतील प्रमुख विरोध पक्ष बनला आहे. तिस-या आणि शेवटच्या स्थानी असलेल्या काँग्रेसजवळ फक्त 4 आमदार आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे सुदीप रॉय बर्मन, आशिष कुमार साहा, दीबा चंद्र हंगखावस, बिस्व बंधू सेन, प्रांजित सिंह रॉय आणि दिलीप सरकार यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. 2013मधल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांनी 60 पैकी 50 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यावेळी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या होत्या, तर टीएमसीला साधं खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र 2016मधली पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक डावे आणि काँग्रेसनं एकत्र मिळून लढली. त्यावेळी या 6 आमदारांनी डाव्यांची साथ सोडत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे पसंत केले होते. मात्र तृणमूल काँग्रेसनंही गेल्या काही दिवसांपूर्वीच या 6 आमदारांची पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणास्तव पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे हे 6 आमदार भाजपामध्ये दाखल झाले असून, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.एखाद्या विधानसभेत पक्षाकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ असताना इतर आमदारांनी बंडखोरी केल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. जर एखाद दुस-या आमदारानं असं केलं असतं तर त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं असतं. मात्र काँग्रेसमध्येच असताना 6 आमदारांच्या एका गटानं बंडखोरी केली होती. आता त्याच 6 आमदारांनी भाजपामध्ये जाणं पसंत केलं आहे. एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसनं या आमदारांची हकालपट्टी केली.येत्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीआधीच हे 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाल्यानं भाजपाला त्रिपुरात बळ मिळालं आहे. या 6 आमदारांना तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आणण्याचं श्रेय आसामचे भाजपाचे नेते आणि शिक्षा मंत्री हिमंत विश्वकर्मा यांना जातं. भाजपा त्रिपुरात कधीच कोणताही जागा जिंकू शकलेली नाही. तसेच तृणमूल काँग्रेसचे इतरही पदाधिकारी लवकरच भाजपामध्ये सहभागी होतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.