शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘मोदीकेअर’चा लाभ सहा जिल्ह्यांनाच! निधीअभावी सरकारची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:12 IST

गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देणारी ‘आयुष्यमान भारत’ ही योजना मोदी सरकार फक्त सहा जिल्ह्यांत राबविणार आहे. ‘मोदीकेअर’सह अन्य सामाजिक सुरक्षा योजना सरकारने घोषित तर केल्या, पण त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधीच नाही.

नवी दिल्ली : गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देणारी ‘आयुष्यमान भारत’ ही योजना मोदी सरकार फक्त सहा जिल्ह्यांत राबविणार आहे. ‘मोदीकेअर’सह अन्य सामाजिक सुरक्षा योजना सरकारने घोषित तर केल्या, पण त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधीच नाही.लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना सामाजिक सुरक्षेचे कवच देणाऱ्या योजनांचा सपाटा लावला आहे. १० कोटी गरिबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे वैद्यकीय कवच, वयस्कांसाठी निवृत्तिवेतन, गरोदर महिलांना विशेष भत्ता, बेरोजगारांना अर्थसाह्य या योजनांचा त्यात समावेश आहे. यासाठी सुमारे ३७,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्या निवडणुकांआधी सुरू व्हाव्या, असा मोदी यांचा आग्रह आहे. पण निधीच्या कमतरतेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.निवडणुकांआधी या योजना सुरू करण्यासाठी सरकारला तत्काळ निधी उभा करावा लागेल. त्यासाठी जीडीपीच्या ०.३८ टक्के अर्थात ५०,००० कोटी रुपये खर्च करावा लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आधीच वित्तीय तुटीचा तिजोरीवर भार असताना आता सामाजिक योजनांसाठी भरमसाट निधी उभा केल्यास ही तूट आणखी वाढण्याची भीती आहे.चार वर्षांत सामाजिक सुरक्षा ‘कोरडी’चसामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने चार वर्षांत काहीच केले नसल्याचे सेंटर फॉर बजेट अ‍ॅण्ड गव्हर्नन्स अकाऊंटेबिलिटीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.देशातील ९०% कर्मचारी असंघटित क्षेत्रात आहेत. त्यांना सामजिक सुरक्षा देण्यासाठी सरकारला पाचव्या वर्षी जाग आली.या क्षेत्राला खºया अर्थाने सुरक्षा देण्यासाठी जीडीपीच्या किमान २%खर्च करण्याची गरज आहे.मात्र सरकारने चार वर्षांत यासाठी जीडीपीच्या फक्त ०.७५% खर्च केला. चारही वर्षांतील या क्षेत्रासाठीची अर्र्थसंकल्पीय तरतूद ०.४०% होती.महत्त्वाकांक्षी योजनासामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार सर्व कर्मचाºयांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आणत आहे. एकूण १५ कामगार कायदे एकत्र करून ही योजना तयार केली जाणार आहे. त्याचे विधेयक पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडले जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य