शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती चिघळली, बांग्लादेशातील मोठ्या जमावाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; BSF ने रोखले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 22:05 IST

बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Bangladesh Violence : अनेक दिवस बांग्लादेशात चाललेल्या आरक्षणविरोधी आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले. सध्या देशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, उद्या नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली या अंतरिम सरकारचा शपथविधी होणार आहे. पण, बांग्लादेशातील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. हिंसक आंदोलनांमुळे अनेकांना देश सोडावा लागत असून, जत्थेच्या जत्थे भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. 

भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्नआज दुपारी हजारो बांग्लादेशींनी पश्चिम बंगालच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला, पण बीएसएफने त्या सर्वांना रोखले. भारत सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, तसेच सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बांग्लादेशी नागरिकांचा मोठा गट आज उत्तर बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी जमला होता. हे सर्व भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण, बॉर्डर गार्ड बांग्लादेश, नागरी प्रशासन आणि बीएसएफच्या जवानांनी या सर्वांना पळवून लावले. 

भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट'बीएसएफच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशातील घडामोडी लक्षात घेता सोमवारी 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व युनिट्समध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सुमारे 2200 किलोमीटर लांबीची सीमा एकट्या पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे. याशिवाय बांग्लादेशची सीमा भारताच्या आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालयशीही आहे. अशा स्थितीत सीमेवर सुरक्षा वाढवणे आणि घुसखोरीचे प्रयत्न थांबवणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांनी चिंता व्यक्त केलीआसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांग्लादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच, जर बांग्लादेशात अशीच अशांतता कायम राहिली, तर अनेकजण भारतात येतील. शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात ईशान्येतील सर्व दहशतवादी गटांचा बांग्लादेशातून खात्मा करण्यात आला, मात्र आता बांग्लादेश पुन्हा एकदा अशा दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू शकते, ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतBSFसीमा सुरक्षा दल