शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती चिघळली, बांग्लादेशातील मोठ्या जमावाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; BSF ने रोखले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 22:05 IST

बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Bangladesh Violence : अनेक दिवस बांग्लादेशात चाललेल्या आरक्षणविरोधी आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले. सध्या देशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, उद्या नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली या अंतरिम सरकारचा शपथविधी होणार आहे. पण, बांग्लादेशातील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. हिंसक आंदोलनांमुळे अनेकांना देश सोडावा लागत असून, जत्थेच्या जत्थे भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. 

भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्नआज दुपारी हजारो बांग्लादेशींनी पश्चिम बंगालच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला, पण बीएसएफने त्या सर्वांना रोखले. भारत सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, तसेच सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बांग्लादेशी नागरिकांचा मोठा गट आज उत्तर बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी जमला होता. हे सर्व भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण, बॉर्डर गार्ड बांग्लादेश, नागरी प्रशासन आणि बीएसएफच्या जवानांनी या सर्वांना पळवून लावले. 

भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट'बीएसएफच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशातील घडामोडी लक्षात घेता सोमवारी 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व युनिट्समध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सुमारे 2200 किलोमीटर लांबीची सीमा एकट्या पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे. याशिवाय बांग्लादेशची सीमा भारताच्या आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालयशीही आहे. अशा स्थितीत सीमेवर सुरक्षा वाढवणे आणि घुसखोरीचे प्रयत्न थांबवणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांनी चिंता व्यक्त केलीआसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांग्लादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच, जर बांग्लादेशात अशीच अशांतता कायम राहिली, तर अनेकजण भारतात येतील. शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात ईशान्येतील सर्व दहशतवादी गटांचा बांग्लादेशातून खात्मा करण्यात आला, मात्र आता बांग्लादेश पुन्हा एकदा अशा दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू शकते, ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतBSFसीमा सुरक्षा दल