शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:49 AM

आयएएस अधिकाऱ्यांच्या असहकारांच्या धोरणामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : आयएएस अधिकाऱ्यांच्या असहकारांच्या धोरणामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तीन मंत्र्यांसह केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले असून शनिवारी या आंदोलनाचा सहावा दिवस होता. आयएएस अधिकाºयांंना संप समाप्त करण्यास सांगा अशी मागणी आपचे नेते नायब राज्यपालांकडे करत आहेत.दिल्ली सरकारमधील आयएएस अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहत नाहीत आणि मंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकांनाही जात नाही. आम्ही संप केलेला नाही, असा त्यांचा दावा आहे. आम्ही रोज कार्यालयात येतो. सरकारचा निषेध म्हणून पाच मिनिटे काम करीत नाही. नंतर मात्र नियमित काम करतो, असा त्यांचा दावा आहे.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि कामगार मंत्री गोपाल राय यांनी सोमवारपासून राज्यपालांच्या कार्यालयात धरणे धरले आहेत. जैन आणि सिसोदिया क्रमश: मंगळवार आणि बुधवारपासून या उपोषणात सहभागी झाले आहेत. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधान मोदी तरी आपल्या अधिकाºयांशिवाय काम करू शकतात काय?आयएएस अधिकाºयांच्या संपावरुन त्यांनी मोदींवर निशाणा साधला आणि अधिकाºयांशिवाय काम करुन दाखविण्याचे आव्हान दिले. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी त्यांना आवाहन केले आहे की, आएएस अधिकाºयांचा संप समाप्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सिसोदिया यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून म्हटले आहे की, आपल्याला जर नायबराज्यपालांच्या कार्यालयातून जबरदस्तीने बाहेर काढले, तर आपण पाण्याचाही त्याग करु. घरूनच काम पाहणाºया नायब राज्यपालांनी मंत्र्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.>प्रदूषणविषयक बैठकीलाही सचिव गैरहजरपर्यावरणमंत्र्यांनी दिल्लीतील धुळीचे वादळ आणि त्यामुळे होत असलेले धोकादायक प्रदुषण या विषयावर बैठक बोलावली होती. त्या बैठकीलाही संबंधित खात्याचे सचिव गैरहजर राहिले. दिल्लीकर अशा संकटाचा सामना करीत असताना, सचिवांंची ही कृती योग्य आहे का, असा सवाल दिल्लीकरच विचारत आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल