शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

काश्मिरात नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडली आहे! उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:10 IST

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले.

जम्मू : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले.राजौरीत नियंत्रण रेषेवरील गावांतून येणाºया लोकांना सुरक्षित आश्रय आणि अन्य सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विधानसभेत भाजप सदस्य रविंदर रैना म्हणाले की, नौशेरा मतदारसंघात नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार होत आहे. यामुळे रहिवाशांचे अतिश्य हाल होत आहेत. लोकांना घर सोडून जावे लागत आहे. सीमा भागातील शाळा बंद आहेत. घरांचे नुकसान होत आहे.या परिस्थितीवर तोडगा काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला. नौशेरा भागातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी मंत्र्यांचेपथक पाठविण्याची मागणी त्यांनी केली. माकपचे सदस्य एम.वाय. तारिगामी आणि भाजपच्या सदस्यांनी रैना यांचे समर्थन केले.यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री सिंह म्हणाले की, पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर परिस्थिती बिघडली आहे. लोक येथून पलायन करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकांना आवश्यक त्या सुविधा देणे आणि नियंत्रण रेषेवरील लोकांची सुरक्षा निश्चित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.गोळीबार सुरूचकाश्मिरात नियंत्रण रेषेजवळ राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्य त्यांना प्रत्युत्तर देत आहे. या चकमकीत कोणत्याही हानीचे वृत्त नाही. राजौरीचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी सांगितले की, नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सकाळी ७ वाजता गोळीबार सुरू असून, पाच गावांना लक्ष्य करुन गोळीबार होत आहे.५ दिवसांत १४ लोकांचा मृत्यूपाकिस्तानकडून जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पुंछ व राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर १८ ते २२ जानेवारी या काळात झालेल्या गोळीबारात ७ नागरिकांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या भागातील ३०० पेक्षा अधिक शाळा बंद ठेवल्या आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान