शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

काश्मिरात नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडली आहे! उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:10 IST

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले.

जम्मू : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले.राजौरीत नियंत्रण रेषेवरील गावांतून येणाºया लोकांना सुरक्षित आश्रय आणि अन्य सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विधानसभेत भाजप सदस्य रविंदर रैना म्हणाले की, नौशेरा मतदारसंघात नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार होत आहे. यामुळे रहिवाशांचे अतिश्य हाल होत आहेत. लोकांना घर सोडून जावे लागत आहे. सीमा भागातील शाळा बंद आहेत. घरांचे नुकसान होत आहे.या परिस्थितीवर तोडगा काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला. नौशेरा भागातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी मंत्र्यांचेपथक पाठविण्याची मागणी त्यांनी केली. माकपचे सदस्य एम.वाय. तारिगामी आणि भाजपच्या सदस्यांनी रैना यांचे समर्थन केले.यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री सिंह म्हणाले की, पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर परिस्थिती बिघडली आहे. लोक येथून पलायन करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकांना आवश्यक त्या सुविधा देणे आणि नियंत्रण रेषेवरील लोकांची सुरक्षा निश्चित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.गोळीबार सुरूचकाश्मिरात नियंत्रण रेषेजवळ राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्य त्यांना प्रत्युत्तर देत आहे. या चकमकीत कोणत्याही हानीचे वृत्त नाही. राजौरीचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी सांगितले की, नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सकाळी ७ वाजता गोळीबार सुरू असून, पाच गावांना लक्ष्य करुन गोळीबार होत आहे.५ दिवसांत १४ लोकांचा मृत्यूपाकिस्तानकडून जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पुंछ व राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर १८ ते २२ जानेवारी या काळात झालेल्या गोळीबारात ७ नागरिकांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या भागातील ३०० पेक्षा अधिक शाळा बंद ठेवल्या आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान