शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गंगा नदीच्या स्वच्छतेची स्थिती अतिशय वाईट, हरित लवादाची नापसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:32 IST

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गंगा नदी स्वच्छ करण्याच्या मुद्द्यावर गुरुवारी तीव्र नापसंती व्यक्त करून परिस्थिती अतिशय वाईट असून ही नदी स्वच्छ करण्यासाठी क्वचितच काही परिणामकारक काम झाले आहे, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गंगा नदी स्वच्छ करण्याच्या मुद्द्यावर गुरुवारी तीव्र नापसंती व्यक्त करून परिस्थिती अतिशय वाईट असून ही नदी स्वच्छ करण्यासाठी क्वचितच काही परिणामकारक काम झाले आहे, असे म्हटले आहे.लवादाचे अध्यक्ष व न्या. आदर्श गोयल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, गंगा स्वच्छ करण्याचे प्रत्यक्ष काम झाल्याचे अधिकाऱ्यांचे कितीही दावे असले तरी ते पुरेसे नाही व परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी नियमित देखरेख आवश्यक आहे. गंगेतील प्रदूषणाबाबत सामान्य माणसाला प्रत्यक्ष काय वाटते हे जाणून घेण्यासाठी पाहणी करण्याचा आदेश लवादाने दिला असून संबंधित अधिकाºयांना ई-मेलद्वारे त्याची माहिती देण्यास सांगितले आहे.नदीची संरक्षण यंत्रणा बळकट व परिणामकारक करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले आहे. गंगा नदी गोमुख व उन्नाव दरम्यान स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश व उत्तराखंड सरकारने जी पावले उचलली होती त्याचा अनुपालन अहवाल न भरल्याबद्दल याआधी लवादाने राष्ट्रीय गंगा स्वच्छता मोहिमेला फटकारले होते. लवादाने आपल्या सविस्तर निर्णयात गंगा स्वच्छ करण्यासाठी मार्गदर्शन केले होते.>कोट्यवधी खर्चूनही प्रश्न कायमहरिद्वार आणि उन्नाव दरम्यान नदीच्या काठापासून १०० मीटर अंतर विकास प्रतिबंधित क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) म्हणून जाहीर करा आणि नदीपासून ५०० मीटर्सपर्यंत कचरा टाकण्यास मनाई करण्यास सांगितले होते. सरकारने गंगा स्वच्छ करण्यासाठी दोन वर्षांत सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही ही नदी अजूनही गंभीर पर्यावरण विषय बनलेला आहे, असे लवादाने म्हटले.