शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते- लष्कर प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:40 IST

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात वाढ

नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते. त्यासाठी देशानं सज्ज राहायला हवं, असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनांचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांनी हे भाष्य केलं आहे.मोदी सरकारनं ५ ऑगस्टला जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. त्यामुळेच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडू शकते असं म्हटल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मोदी सरकारनं नागरिकत्व कायद्यात केलेल्या बदलांमुळे दोन अण्वस्त्र देशांमध्ये युद्ध होऊ शकतं, असा इशारा खान यांनी कालच दिला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डींनी नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची आकडेवारी दिली होती. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तानी सैन्याकडून ९५० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं रेड्डींनी सभागृहाला सांगितलं. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर