शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सीताराम येचुरी, डी. राजांना श्रीनगर विमानतळावर रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:42 IST

दिल्लीला परत पाठवले

श्रीनगर : काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी व भाकपचे सरचिटणीस डी. राजा या नेत्यांना शुक्रवारी श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले. त्यांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेऊन नंतर दिल्लीला परत पाठविले. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही गुरुवारी या विमानतळावर रोखण्यात आले होते.काश्मीरमधील माकपचे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी व अन्य कम्युनिस्ट नेत्यांना भेटण्यासाठी येचुरी व डी. राजा श्रीनगरमध्ये आले होते. येचुरी यांनी सांगितले की, आम्हाला श्रीनगर विमानतळावरच पोलिसांनी रोखले. सुरक्षेच्या कारणामुळे असा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.जमावबंदी कायमपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलमाच्या निर्णयाचे देशात सर्वत्र स्वागत झाले असून जम्मू-काश्मीरमधील स्थिती सुरळीत होत आहे, असा दावा गुरुवारी केला होता. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वत्र जमावबंदी लागू असून, नेहमीपेक्षा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यातूनच खरी वस्तुस्थिती कळून येते, अशी टीका डाव्या पक्षांनी केली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370