शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पाकिस्तानच्या सिमरनला हवं भारतीय नागरिकत्व; सांगितली मुलींवरील अत्याचाराची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 11:38 IST

सिमरनने डीएमला सांगितले की, ती 27 सप्टेंबर 2013 रोजी तिची मावशी बरजी बाईसोबत पाकिस्तानातून भारतात आली होती. ती गेल्या दहा वर्षांपासून अलीगडमध्ये तिच्या आजी-आजोबांच्या घरी व्हिसावर राहत आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू कुटुंबांवर अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. 27 सप्टेंबर 2013 रोजी पाकिस्तानात राहणारी सिमरन तिची काकी बरजी बाईसोबत पाकिस्तानातून भारतात (यूपीमधील अलीगड) आली. त्यानंतर ती लाँग टर्म व्हिसावर तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहत आहे. तिने भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अलीगडच्या डीएमकडे अर्ज केला आहे. सिमरन वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

सिमरन नावाची मुलगी तिच्या आजोबांसोबत अलीगडचे डीएम इंद्र विक्रम सिंह यांना भेटण्यासाठी आली होती. सिमरनने डीएमला सांगितले की, ती 27 सप्टेंबर 2013 रोजी तिची मावशी बरजी बाईसोबत पाकिस्तानातून भारतात आली होती. ती गेल्या दहा वर्षांपासून अलीगडमध्ये तिच्या आजी-आजोबांच्या घरी व्हिसावर राहत आहे. सिमरनने डीएमला सांगितले की ती अलीगड मुस्लिम विद्यापीठातून बीडीएसचे शिक्षण घेत आहे. तिला भारतीय नागरिकत्व हवे आहे. सिमरने सांगितले की, तिने 2019 मध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला होता.

डीएम इंद्र विक्रम सिंह यांनी सिमरनच्या सर्व गोष्टी ऐकल्या. सिमरनला तिचे नाव उर्दूमध्ये कागदावर लिहायला लावले. याप्रकरणी डीएम सांगतात की, शहरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. याबाबत राज्य आणि केंद्र पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. सरकारच्या सूचनेच्या आधारे, तपासणी आणि आक्षेप निकाली काढल्यानंतर, भारतीय नागरिकत्व देण्यासाठी सुधारित माहिती आणि शिफारसीसह विस्तृत अहवाल पाठविला जात आहे. सिमरन आणि तिची मावशी बरजी बाई यांच्या भारतीय नागरिकत्वाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

सिमरनने सांगितले की, तिचे आई-वडील, दोन भाऊ आणि आत्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जाफराबाद येथे राहतात. त्यांनाही भारतात यायचे आहे. पाकिस्तानात हिंदू भगिनी आणि मुलींवर अत्याचार आणि अराजकतेला सामोरे जावे लागत आहे. या घटनांमुळे ती इतकी घाबरली की ती पाकिस्तानातून थेट अलीगडमध्ये तिच्या आजोबांकडे आली. भारत आणि पाकिस्तानच्या वातावरणात फरक आहे.

सिमरनचे आजोबा रमेशलाल यांनी सांगितले की, पाकिस्तानी नागरिक असल्याने तो आणि त्याचे कुटुंब एलटीव्ही म्हणजेच दीर्घकालीन व्हिसाद्वारे अलीगढमध्ये राहत होते. रमेशलाल यांनी सांगितले की, त्यांनी 2015 मध्ये पत्नी लाजवंती, मुलगा कैलाश आणि मुलगी पूजा यांच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यांचा एक मुलगा हरेशलाल सध्या बलुचिस्तानमध्ये राहतो, तर दुसरा मुलगा शंकरलाल आणि सून बरजी बाई 2013 मध्ये अलीगडला आले. त्यांनी नागरिकत्वासाठी अर्जही केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान