शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

बोगद्याजवळ आता सन्नाटा! सर्व कामगार तंदुरुस्त, डॉक्टरांनी दिली घरी परतण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:16 IST

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर बुधवारी ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता.

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर बुधवारी ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता. दरम्यान, एम्स-ऋषिकेशच्या डॉक्टरांनी सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना घरी परतण्याची परवानगी दिली आहे.

मोठ्या बचाव मोहिमेदरम्यान बंद करण्यात आलेले बोगद्याभोवतीचे रस्ते बुधवारी खुले करण्यात आले. बोगद्यावर पोलिसांची एक तुकडी मात्र तैनात करण्यात आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले की, बोगद्याचे बांधकाम काही दिवस बंद राहणार आहे. एका कामगाराने सांगितले की, त्याला दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे, त्यानंतर त्याला कंत्राटदाराकडून कळवले जाईल. दुसरीकडे सुरक्षा तपासणी होईपर्यंत काम बंद राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बचाव पथकातील सदस्य आपली यंत्रे गुंडाळून ठेवताना दिसत आहेत.

कामगारांवर झाली पैशांची बरसातबोगदा बांधणारी नवयुग ही कंपनी आता बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई देणार आहे.याच वेळी सर्व मजुरांना दोन महिन्यांच्या पगारासह रजाही देण्यात येणार आहे. सर्वांत मोठी बाब म्हणजे या बचावकार्यात सहभागी झालेल्या कामगारांना दोन महिन्यांचा बोनसही दिला जाणार आहे. उत्तराखंड सरकार बोगद्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक कामगाराला एक लाख रुपये, हॉस्पिटलचा खर्च आणि प्रवासभाडे देत आहे. 

या प्रेमानेच आपला भारत देश तयार झाला आहे...बोगद्यात अडकलेल्या मजूर बांधवांना सोडवण्याच्या प्रयत्नात जेव्हा मोठ्या मशिन्स कुचकामी ठरल्या तेव्हा रॅट मायनर्सना हाताने बोगदा खोदण्यासाठी बोलावण्यात आले. या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून अवघ्या २४ तासांत बचावकार्य पूर्ण केले.कामगारांपैकी एक असलेल्या मोहम्मद ईर्शादने प्रत्येकासाठी  प्रार्थना केली आहे की, देशात प्रेम टिकून राहावे आणि प्रत्येक व्यक्तीवर माणूस म्हणून प्रेम केले जावे. नासिर हुसेन या दुसऱ्या रॅट होल खाणकाम करणाऱ्या कामगाराने अडकलेल्या कामगारांना दिसताच मिठी मारली, हेच प्रेम आहे. या प्रेमानेच आपला भारत देश तयार झाला आहे. जय हिंद असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.रॅटमायनर्सना ५० हजारमजुरांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट खाण कामगारांना सरकारने प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या कामगारांना नवयुग कंपनी दोन महिन्यांचा बोनसही देणार आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडIndiaभारत