शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

'सॅल्यूट' इंडियन आर्मी... बर्फाळ प्रदेशात अडकेल्या 2500 पर्यटकांची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 10:12 IST

सिक्कीम म्हटलं की पर्यटन आलंच. त्यात, पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवळ पसरली असल्याने पर्यटकांचा जोर या मोसमात वाढतो.

नवी दिल्ली - सिक्किम येथील बर्फाच्छादित प्रदेशात अडकलेल्या 2500 नागरिकांची भारतीय सैन्याकडून सुटका करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममधील नाथू ला या बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या पर्यंटकांना सुखरुपस्थळी पोहोचवले. नाथू ला आणि जवळील प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेले हजारो पर्यटक येथे अडकून पडले होते. 

सिक्कीम म्हटलं की पर्यटन आलंच. त्यात, पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवळ पसरली असल्याने पर्यटकांचा जोर या मोसमात वाढतो. त्यामुळेच सिक्कीममध्येही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. येथील नाथू ला दरी व जवळील प्रदेशात अनेक पुरुष पर्यंटकांसह महिला आणि लहानमुलेही अडकली होती. त्यावेळी, भारतीय जवानांनी जवळपास 2500 पर्यटकांना या बर्फवृष्टीपासून बचाव केला. अनेक पर्यटक या परिसरात आपल्या वाहनांसह अडकले होते. जवळपास 300 ते 400 वाहने या बर्फवृष्टीमध्ये अडकले होते. भारतीय सैन्याला याबाबतची सूचना मिळताच, लष्कराने मिशन बचाव हाती घेऊन सर्वांची सुखरुप सुटका केली. त्यानंतर, या सर्वच पर्यटकांना अन्न-पाणी, कपडे आणि औषधोपचार देण्यात आले. भारतीय सैन्याच्या या धाडसी कामगिरीमुळे पर्यटक भावूक बनले होते. तर, भारतीय सैन्याच्या आभार शब्दात मानता येणं शक्य नसल्याच्या भावनाही अनेकांनी बोलून दाखवल्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsikkimसिक्किमSnowfallबर्फवृष्टी