शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत आज कृषी विधेयके संमत होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:21 IST

सरकारची तयारी । विरोधकांना एकत्र आणण्यात काँग्रेसला अपयश; २५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांचे छेडणार आंदोलन, उद्या बोलावली बैठक

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी सरकार कृषीसंबंधी तीन विधेयके राज्यसभेत रविवारी संमत करून घेण्यात यश मिळवणार असे दिसते. कारण काँग्रेस विरोधी पक्षांना सरकारविरोधात एकत्र आणण्यात यशस्वी झालेली नाही. याचे संकेत शनिवारी काँग्रेसची संसदीय रणनीती बनवणाºया दहा सदस्यांच्या समितीच्या बैठकीत मिळाले. रविवारी होणाºया मतदानासाठी ही समिती रणनीती बनवते.

उच्चपदस्थ सूत्रांनुसार काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्र करण्यात जे प्रयत्न करीत होती त्यात टीआरएस आणि शिवसेना वगळता इतर पक्ष विधेयकांना विरोध करण्यास तयार झाले नाहीत. त्यात बिजेडी, वायएसआर काँग्रेस, बसप, अण्णाद्रमुक हे प्रमुख आहेत, तर द्रमुक, अकाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, समाजवादी पक्षासारखे सरकारविरोधात मतदान करू शकतात. संसदेत कृषी विधेयकांवरून विरोधी पक्षांचा संभाव्य पराभव पाहता आता सरकारविरोधात देशातील शेतकरी विरोधी पक्षांना सोबत घेऊन २५ सप्टेंबरपासून देशव्यापी बंदचे आयोजन करतील. त्याचे धोरण बनवण्यासाठी काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या सरचिटणीसांची व राज्यांच्या प्रभारींची बैठक बोलावली आहे. बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरेल. या बैठकीला दुजोरा देताना पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड होणार नाही. संख्याबळावर सरकार विधेयक संमत करून घेईलही; परंतु आमचा आवाज बंद करू शकत नाही. त्यांचे म्हणणे होते की, आता संघर्ष रस्त्यांवर होईल.संसदेचे अधिवेशन लवकर संपणार?नवी दिल्ली : संसदेचे सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्याच्या मध्यात संपण्याची चिन्हे आहेत. संसद सदस्यांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचा धोका वाढल्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो, असे अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले.च्लोकसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन लवकर संपवण्याच्या बाजूने बºयाच राजकीय पक्षांनी कौल दिला. या बैठकीत सगळ्या पक्षांचे सभागृहातील नेते, सरकारी प्रतिनिधी होते व अध्यक्षस्थानी सभापती होते. १४ सप्टेंबर रोजी अधिवेशन सुरू झाले व ते एक आॅक्टोबर रोजी संपणार आहे. अंतिम निर्णय संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल.प्रियांका गांधींनी केली टीका1 कृषी संबंधित तीन विधेयकाबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘‘शेतकºयांसाठी ही कठीण वेळ आहे. सरकारने किमान आधारभूत किमतीवर कृषी माल खरेदीची व्यवस्था करून त्यांना मदत करायला हवी तर झाले उलटेच. भाजप सरकार त्याच्या श्रीमंत अब्जावधी मित्रांना कृषी क्षेत्रात घुसवण्यासाठी जास्त आतुर दिसत आहे. सरकार शेतकºयांचे म्हणणेही ऐकत नाही.’’2 इकडे भाजपने काँग्रेसच्या २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्याचा आधार घेऊन म्हटले की, त्यानेच कृषी कायद्यांत दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. भाजपचा हा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्टपणे नाकारला. ते म्हणाले, ‘‘भाजप वस्तुस्थिती मोडूनतोडून सादर करीत आहे.3 काँग्रेसने आश्वासनह्ण दिले होते ते एपीएमसी अधिनियम संपवण्याच्या आधी काँग्रेस शेतकºयांसाठी जागोजागी कृषी बाजाराची स्थापना करण्याचे, म्हणजे शेतकरी सहजपणे त्यांची उत्पादने तेथे विकू शकतील.’’ मोदी सरकार एमएसपीचे सिद्धांत आणि सार्वजनिक खरेदीप्रणाली नष्ट करून टाकील, असाही त्यांनी आरोप केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी