शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत आज कृषी विधेयके संमत होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:21 IST

सरकारची तयारी । विरोधकांना एकत्र आणण्यात काँग्रेसला अपयश; २५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांचे छेडणार आंदोलन, उद्या बोलावली बैठक

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी सरकार कृषीसंबंधी तीन विधेयके राज्यसभेत रविवारी संमत करून घेण्यात यश मिळवणार असे दिसते. कारण काँग्रेस विरोधी पक्षांना सरकारविरोधात एकत्र आणण्यात यशस्वी झालेली नाही. याचे संकेत शनिवारी काँग्रेसची संसदीय रणनीती बनवणाºया दहा सदस्यांच्या समितीच्या बैठकीत मिळाले. रविवारी होणाºया मतदानासाठी ही समिती रणनीती बनवते.

उच्चपदस्थ सूत्रांनुसार काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्र करण्यात जे प्रयत्न करीत होती त्यात टीआरएस आणि शिवसेना वगळता इतर पक्ष विधेयकांना विरोध करण्यास तयार झाले नाहीत. त्यात बिजेडी, वायएसआर काँग्रेस, बसप, अण्णाद्रमुक हे प्रमुख आहेत, तर द्रमुक, अकाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, समाजवादी पक्षासारखे सरकारविरोधात मतदान करू शकतात. संसदेत कृषी विधेयकांवरून विरोधी पक्षांचा संभाव्य पराभव पाहता आता सरकारविरोधात देशातील शेतकरी विरोधी पक्षांना सोबत घेऊन २५ सप्टेंबरपासून देशव्यापी बंदचे आयोजन करतील. त्याचे धोरण बनवण्यासाठी काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या सरचिटणीसांची व राज्यांच्या प्रभारींची बैठक बोलावली आहे. बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरेल. या बैठकीला दुजोरा देताना पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड होणार नाही. संख्याबळावर सरकार विधेयक संमत करून घेईलही; परंतु आमचा आवाज बंद करू शकत नाही. त्यांचे म्हणणे होते की, आता संघर्ष रस्त्यांवर होईल.संसदेचे अधिवेशन लवकर संपणार?नवी दिल्ली : संसदेचे सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्याच्या मध्यात संपण्याची चिन्हे आहेत. संसद सदस्यांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचा धोका वाढल्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो, असे अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले.च्लोकसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन लवकर संपवण्याच्या बाजूने बºयाच राजकीय पक्षांनी कौल दिला. या बैठकीत सगळ्या पक्षांचे सभागृहातील नेते, सरकारी प्रतिनिधी होते व अध्यक्षस्थानी सभापती होते. १४ सप्टेंबर रोजी अधिवेशन सुरू झाले व ते एक आॅक्टोबर रोजी संपणार आहे. अंतिम निर्णय संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल.प्रियांका गांधींनी केली टीका1 कृषी संबंधित तीन विधेयकाबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘‘शेतकºयांसाठी ही कठीण वेळ आहे. सरकारने किमान आधारभूत किमतीवर कृषी माल खरेदीची व्यवस्था करून त्यांना मदत करायला हवी तर झाले उलटेच. भाजप सरकार त्याच्या श्रीमंत अब्जावधी मित्रांना कृषी क्षेत्रात घुसवण्यासाठी जास्त आतुर दिसत आहे. सरकार शेतकºयांचे म्हणणेही ऐकत नाही.’’2 इकडे भाजपने काँग्रेसच्या २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्याचा आधार घेऊन म्हटले की, त्यानेच कृषी कायद्यांत दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. भाजपचा हा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्टपणे नाकारला. ते म्हणाले, ‘‘भाजप वस्तुस्थिती मोडूनतोडून सादर करीत आहे.3 काँग्रेसने आश्वासनह्ण दिले होते ते एपीएमसी अधिनियम संपवण्याच्या आधी काँग्रेस शेतकºयांसाठी जागोजागी कृषी बाजाराची स्थापना करण्याचे, म्हणजे शेतकरी सहजपणे त्यांची उत्पादने तेथे विकू शकतील.’’ मोदी सरकार एमएसपीचे सिद्धांत आणि सार्वजनिक खरेदीप्रणाली नष्ट करून टाकील, असाही त्यांनी आरोप केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी