शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

नंदनवन झाले पुन्हा शांत! काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:15 IST

अधिकाऱ्यांच्या मते जानेवारी २०२५ व जानेवारी २०२४ चे आकडे समान असले तरी गतवर्षी एक दहशतवादी ठार तर दोन जवान शहीद झाले होते.

-सुरेश एस डुग्गर श्रीनगर : जम्मू-काश्मिरात जानेवारी २०२५ मध्ये दहशतवादी हल्ल्यात केवळ तिघांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट झाल्यामुळे गेल्या दोन दशकांमधील हे दुसरे वर्ष आहे, ज्याची सुरुवात शांततेत झाली. जानेवारीत दोन दहशतवादी हल्ल्यांत एक जवान व दोन दहशतवाद्यांसह तिघांचा मृत्यू झाला. २० जानेवारीला बारामुल्लातील दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला. त्यानंतर ३० जानेवारीला पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील चकमकीत घुसखोरी करणारे दोन दहशतवादी ठार झाले.

अधिकाऱ्यांच्या मते जानेवारी २०२५ व जानेवारी २०२४ चे आकडे समान असले तरी गतवर्षी एक दहशतवादी ठार तर दोन जवान शहीद झाले होते. या वर्षी मात्र दोन दहशतवादी ठार तर एक जवान शहीद झाला. २००० दशकाच्या मध्यात दहशतवादी हल्ल्यांची संख्या घटली होती.  

जानेवारी प्राणघातक महिना 

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २००१ मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये २०३ मृत्यू झाले. २००२ मध्ये दहशतवादी हल्ल्यात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अलीकडच्या इतिहासातील हा महिना सर्वांत प्राणघातक जानेवारी ठरला. जानेवारी २००० मध्ये दहशतवादी हल्ल्यात एकही हत्या वा मृत्यू झाला नव्हता. 

जम्मू-काश्मीर: ड्युटीवर परतणारा सैनिक बेपत्ता

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुट्ट्या संपवून ड्युटीवर घरी परतणारा  सैनिक बेपत्ता झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, रायफलमन आबिद भट शनिवारी रंगरेथ लष्करी छावणीत कर्तव्यावर परतण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील चित्तरगुल येथील आपल्या घरातून निघाले होते. भट्ट शनिवारी सकाळपर्यंत छावणीत पोहोचले नाहीत.

अतिरेकी कारवायांना चाप

गत पाच वर्षांत दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे हल्ल्यांतील बळींच्या संख्येत सरासरी ३४ वरून १६ पर्यंत घटली.

दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नाच्या माध्यमातून दहशतवादाला खातपाणी घालणाऱ्या संस्था नष्ट करण्यात आल्या. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा तसेच अमूर्त संपतीला लक्ष्य करण्यात आले. 

दहशतवाद्यांशी निगडित ७२ कर्मचाऱ्यांना कमल ३११ या अंतर्गत बडतर्फ करण्यात आले.

अवैधरीत्या चालवल्या जाणाऱ्या दहा संघटना व गटांवर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा अर्थात यूएपीए या अंतर्गत बंदी घातली. यासोबत २२ लोकांना दहशतवादी घोषित करण्यात आली.

गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनेत भरती होणाऱ्या युवकांच्या संख्येतही मोठी घट झाली. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादtourismपर्यटनIndian Armyभारतीय जवान