शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कंदहार घटनेनंतर विमानतळ सुरक्षेत लक्षणीय बदल; CISF चे प्रमोद फळणीकरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 09:57 IST

या संस्थेने गेल्या ५० वर्षांमध्ये सुरक्षेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले असून, आज विमानतळ, बंदरे, पीएसयू त्याचप्रमाणे व्हीआयपींची सुरक्षा करण्यात सीआयएसएफची भूमिका महत्त्वपूर्ण आहे

सुरेश भुसारीनवी दिल्ली : देशातील हवाई प्रवास सुरक्षित करण्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) भूमिका महत्त्वपूर्ण असून, कंदहारच्या घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षा तोडण्यास दहशतवाद्यांना यश आले नाही. परंतु यासोबत सामान्य प्रवाशांना हवाई प्रवास करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची माहिती दिल्ली येथील सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक (विमान वाहतूक सुरक्षा) प्रमोद फळणीकर यांनी दिली.

सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद फळणीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीआयएसएफची स्थापना, तिचे आंतरिक सुरक्षेमधील स्थान, दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी जवानांकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता व विमानतळांवर प्रवासीस्नेही सुरक्षा पुरविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल माहिती दिली. मध्यप्रदेश केडरचे १९८९च्या तुकडीचे आयपीएस असलेले फळणीकर मूळ पुण्यातील आहेत.

या संस्थेने गेल्या ५० वर्षांमध्ये सुरक्षेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले असून, आज विमानतळ, बंदरे, पीएसयू त्याचप्रमाणे व्हीआयपींची सुरक्षा करण्यात सीआयएसएफची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. डिसेंबर १९९९मध्ये पाकच्या दहशतवाद्यांनी भारतीय विमान कंदहारला हायजॅक केले होते. या घटनेपर्यंत विमानतळांवरील सुरक्षा संबंधित राज्यांच्या पोलिसांकडे होती, असे सांगून फळणीकर म्हणाले, यानंतर सरकारने विमानतळांवरील सुरक्षा भक्कम करण्याचा निर्णय घेतला. आज देशातील ६५ विमानतळांची सुरक्षा या संस्थेकडे आहे. कंदहार घटनेनंतर देशातील विमानतळांवर हायजॅकची एकही घटना घडली नाही. विमानतळांच्या सुरक्षेत लक्षणीय बदल झाल्याचा उल्लेख फळणीकर यांनी आवर्जुन केला.

सुरक्षेच्या मानकांमध्ये आता खूप बदल झाल्याचे सांगून फळणीकर म्हणाले, दहशतवादीसुद्धा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करतात. त्यामुळे या तत्त्वाचा सामना करण्यासाठी सीआयएसएफसुद्धा वारंवार जवानांना प्रशिक्षित करून त्यांना अत्याधुनिक साधने  उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे दिल्ली विमानतळाचा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जगातील अव्वल विमानतळांमध्ये समावेश होतो. विमानतळाची सुरक्षा करताना सामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजीसुद्धा सीआयएसएफ घेत असल्याचे सांगून ते म्हणाले, आता विमानप्रवास मोठ्या प्रमाणावर केला जात आहे, असे ते म्हणाले.