शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

कंदहार घटनेनंतर विमानतळ सुरक्षेत लक्षणीय बदल; CISF चे प्रमोद फळणीकरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 09:57 IST

या संस्थेने गेल्या ५० वर्षांमध्ये सुरक्षेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले असून, आज विमानतळ, बंदरे, पीएसयू त्याचप्रमाणे व्हीआयपींची सुरक्षा करण्यात सीआयएसएफची भूमिका महत्त्वपूर्ण आहे

सुरेश भुसारीनवी दिल्ली : देशातील हवाई प्रवास सुरक्षित करण्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) भूमिका महत्त्वपूर्ण असून, कंदहारच्या घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षा तोडण्यास दहशतवाद्यांना यश आले नाही. परंतु यासोबत सामान्य प्रवाशांना हवाई प्रवास करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची माहिती दिल्ली येथील सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक (विमान वाहतूक सुरक्षा) प्रमोद फळणीकर यांनी दिली.

सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद फळणीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीआयएसएफची स्थापना, तिचे आंतरिक सुरक्षेमधील स्थान, दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी जवानांकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता व विमानतळांवर प्रवासीस्नेही सुरक्षा पुरविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल माहिती दिली. मध्यप्रदेश केडरचे १९८९च्या तुकडीचे आयपीएस असलेले फळणीकर मूळ पुण्यातील आहेत.

या संस्थेने गेल्या ५० वर्षांमध्ये सुरक्षेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले असून, आज विमानतळ, बंदरे, पीएसयू त्याचप्रमाणे व्हीआयपींची सुरक्षा करण्यात सीआयएसएफची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. डिसेंबर १९९९मध्ये पाकच्या दहशतवाद्यांनी भारतीय विमान कंदहारला हायजॅक केले होते. या घटनेपर्यंत विमानतळांवरील सुरक्षा संबंधित राज्यांच्या पोलिसांकडे होती, असे सांगून फळणीकर म्हणाले, यानंतर सरकारने विमानतळांवरील सुरक्षा भक्कम करण्याचा निर्णय घेतला. आज देशातील ६५ विमानतळांची सुरक्षा या संस्थेकडे आहे. कंदहार घटनेनंतर देशातील विमानतळांवर हायजॅकची एकही घटना घडली नाही. विमानतळांच्या सुरक्षेत लक्षणीय बदल झाल्याचा उल्लेख फळणीकर यांनी आवर्जुन केला.

सुरक्षेच्या मानकांमध्ये आता खूप बदल झाल्याचे सांगून फळणीकर म्हणाले, दहशतवादीसुद्धा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करतात. त्यामुळे या तत्त्वाचा सामना करण्यासाठी सीआयएसएफसुद्धा वारंवार जवानांना प्रशिक्षित करून त्यांना अत्याधुनिक साधने  उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे दिल्ली विमानतळाचा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जगातील अव्वल विमानतळांमध्ये समावेश होतो. विमानतळाची सुरक्षा करताना सामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजीसुद्धा सीआयएसएफ घेत असल्याचे सांगून ते म्हणाले, आता विमानप्रवास मोठ्या प्रमाणावर केला जात आहे, असे ते म्हणाले.