शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘शुभमंगल’ ४ लाख काेटींवर; यावर्षी सनईचाैघड्यांची उलाढाल वाढणार, प्रतिविवाह काेट्यवधींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 07:11 IST

लग्नाची खरेदी, सजावट, भाेजनव्यवस्था, सभागृहे तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून यंदा तब्बल ४.२५ लाख काेटी रुपयांची उलाढाल हाेण्याचा अंदाज आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीनंतर देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू हाेणार आहे. देशभरात यंदाच्या हंगामात तब्बल ३५ लाख लग्न हाेण्याचा अंदाज असून आतपासूनच सर्वांची लगीनघाई सुरू झाली आहे. 

लग्नाची खरेदी, सजावट, भाेजनव्यवस्था, सभागृहे तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून यंदा तब्बल ४.२५ लाख काेटी रुपयांची उलाढाल हाेण्याचा अंदाज आहे. सणासुदीची खरेदी, लग्नावर हाेणारे खर्च इत्यादींमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकासदर वाढून ६.५ ते ६.८ टक्के राहू शकताे, असा अंदाज आहे.

यावर्षी २३ नाेव्हेंबरनंतर लग्नाचा हंगाम सुरू हाेणार आहे. साधारणत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणाऱ्या हंगामात ३५ लाखांपेक्षा जास्त विवाह समारंभ हाेणार आहेत. यासाठी देशभरात विविध क्षेत्रातील व्यापारीही सज्ज झाले आहेत. २० प्रमुख शहरांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास २ लाख विवाह दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्राे शहरांमध्येच हाेण्याचा अंदाज आहे. सुमारे २ लाख काेटी रुपयांची उलाढाल या शहरांतून हाेईल.

लग्नासाठी अशी हाेते खरेदीघरांची दुरूस्ती, रंगरंगाेटी, दागिन्यांची खरेदी, लग्नासाठी आवश्यक वस्त्रे, जाेडे, आमंत्रण पत्रिका, सुका मेवा, मिठाई, फळे, पूजा साहित्य, किरणा, सजावटीचे सामान, भेटवस्तू, किरणा, वाहने इत्यादींवर प्रचंड खर्च हाेताे. 

या सेवांवर हाेताे खर्चलग्नासाठी काही सेवा महत्त्वाच्या असतात. त्यात सभागृह, लाॅन, मंडप, खानपान सेवा, स्वागत, सनई, बॅंडबाजा, फाेटाेग्राफर, व्हिडीओग्राफर, घाेडे, बग्गी, राेषणाई इत्यादींवर प्रमुख भर असताे. 

एका विवाहात एवढा खर्च!६ लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह ३ लाख रुपये१० लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह ६ लाख रुपये१२ लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह १० लाख रुपये६ लाख लग्नांमध्ये  प्रतिविवाह २५ लाख रुपये५० हजार लग्नांत ५० लाखांचा खर्च५० हजार लग्नांत  प्रतिविवाह १ काेटी रुपयांचा खर्च.

सणासुदीत खिशावर भारलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामासोबतच सुट्या सुरू झाल्यामुळे लोक प्रवास व पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे हवाई प्रवास भाडे आणि हॉटेलांचे भाडे यांत जबरदस्त वाढ झाली आहे.दिवाळीसाठी १० ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देशातील प्रमुख स्थानांसाठी हवाई भाडे ४४ टक्के वाढले आहे. देशातील हवाई प्रवास क्षमता कमी झाली आहे. वाढलेली मागणी आणि प्रवासी वाहतूक क्षमतेतील कमतरता यामुळे ही भाडेवाढ झाली आहे. 

८,७८८ : सरासरी भाडे मुंबई - दिल्ली मार्गावरील दिवाळीच्या आठवड्यातील आहे. 

टॅग्स :marriageलग्न