शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कलियुगातील श्रावणबाळ; खांद्यावरील कावडीत आई-वडिलांना बसवून ४० किलोमीटरची पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:02 IST

कलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

ठळक मुद्देकलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे

मयुरभंज, दि. 1- खांद्यावर कावड घेऊन आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन गेलेल्या श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. लहानपणी अनेकदा प्रत्येकाने ही गोष्ट ऐकली असेलच. पण आता कलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे.  पोलिसांकडून दाखल झालेला खोटा गुन्हा, न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळायला होणारा उशिर आणि ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याने ओडिशातील एका व्यक्तीवर श्रावण बाळ होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे.

ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावातील कार्तिक सिंह यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेल्याने आणि हातात पैसा नसल्याने खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ कार्तिक यांच्यावर आली. कार्तिक यांच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

कार्तिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना ग्रामस्थांनी त्यांना वाळीत टाकलं. ‘माझ्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही. गावातील लोकांकडून कोणतंही काम दिलं जात नाही. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी घरात कोणीही नसल्याने नोकरीसाठी शहरातही जाता येत नाही’असं कार्तिक यांनी सांगितलं आहे. सुनावणीसाठी कोर्टात गेल्यावर घरात आई-वडिलांची काळजी कोण घेणार, असा प्रश्न कार्तिक यांच्यासमोर निर्माण होतो. म्हणूनच ते आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करतात.खोटा गुन्हा दाखल झालेले कार्तिक सुशिक्षित आहेत. पण ६ ते ७ वर्षांपासून गुन्हा दाखल असल्याने तसंच त्या प्रकरणाचा अजूनही निकाल न लागल्याने नोकरी मिळत नसल्याचं  ते सांगतात. याच कारणामुळे त्यांचं अजून लग्न झालेलं नाही.ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात असे अनेकजण असल्याचं वकील प्रभूदान मरांडी यांचं म्हणणं आहे. कार्तिक यांच्याबरोबर जे झालं ते याआधीही अनेकांसोबत झालं आहे. अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचं मरांडी यांनी सांगितलं. मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांच्या या खोट्या गुन्ह्याची शिक्षा अनेकांना भोगावी लागली आहे, असंही वकिलांनी सांगितलं.