शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कलियुगातील श्रावणबाळ; खांद्यावरील कावडीत आई-वडिलांना बसवून ४० किलोमीटरची पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:02 IST

कलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

ठळक मुद्देकलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे

मयुरभंज, दि. 1- खांद्यावर कावड घेऊन आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन गेलेल्या श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. लहानपणी अनेकदा प्रत्येकाने ही गोष्ट ऐकली असेलच. पण आता कलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे.  पोलिसांकडून दाखल झालेला खोटा गुन्हा, न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळायला होणारा उशिर आणि ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याने ओडिशातील एका व्यक्तीवर श्रावण बाळ होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे.

ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावातील कार्तिक सिंह यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेल्याने आणि हातात पैसा नसल्याने खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ कार्तिक यांच्यावर आली. कार्तिक यांच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

कार्तिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना ग्रामस्थांनी त्यांना वाळीत टाकलं. ‘माझ्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही. गावातील लोकांकडून कोणतंही काम दिलं जात नाही. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी घरात कोणीही नसल्याने नोकरीसाठी शहरातही जाता येत नाही’असं कार्तिक यांनी सांगितलं आहे. सुनावणीसाठी कोर्टात गेल्यावर घरात आई-वडिलांची काळजी कोण घेणार, असा प्रश्न कार्तिक यांच्यासमोर निर्माण होतो. म्हणूनच ते आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करतात.खोटा गुन्हा दाखल झालेले कार्तिक सुशिक्षित आहेत. पण ६ ते ७ वर्षांपासून गुन्हा दाखल असल्याने तसंच त्या प्रकरणाचा अजूनही निकाल न लागल्याने नोकरी मिळत नसल्याचं  ते सांगतात. याच कारणामुळे त्यांचं अजून लग्न झालेलं नाही.ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात असे अनेकजण असल्याचं वकील प्रभूदान मरांडी यांचं म्हणणं आहे. कार्तिक यांच्याबरोबर जे झालं ते याआधीही अनेकांसोबत झालं आहे. अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचं मरांडी यांनी सांगितलं. मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांच्या या खोट्या गुन्ह्याची शिक्षा अनेकांना भोगावी लागली आहे, असंही वकिलांनी सांगितलं.