शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये...

By admin | Published: March 15, 2016 12:34 AM

लोकमत मुलाखत

लोकमत मुलाखत
जळगाव- अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. असे व्हायला नको... हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाचे प्रकरण घडले. त्यानंतरचे जेएनयुमधील कन्हैया कुमारचे प्रकरण समोर आले. सर्वत्र विद्रोह, देशद्रोह..., अशी चर्चा सुरू झाली... पण विद्रोह, देेशद्रोह आणि आक्रोश असे वेगवेगळे मुद्दे आहेत. जातीपाती, सामाजिक नाकेबंदीमुळे आक्रोश होत आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहीजे. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मत कवी, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
मंजुळे हे सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासंबंधी आले असता त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न- रोहित वेमुला, कन्हैया कुमारच्या प्रकरणाकडे आपण कसे पाहता?
मंजुळेे- रोहित वेमुला व कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले ते चुकीचे आहे. असा अन्याय इतरत्र कुणावर व्हायला नको. विद्यार्थी हा देशाचा महत्त्वाचा घटक असतो. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे योग्य वाटत नाही.

प्रश्न- आपल्या फॅण्ड्री सिनेमामागील स्फूर्ती कुणाची आहे?
मंजुळे- मी जातीने वडार आहे. पण आपल्याकडे जातीपातीच्या भिंती आहेत. अशी नाकेबंदी आहे की त्यात अडकवून ठेवले जाते. तुच्छ वागणूक व इतर असे वाईट प्रकार होतात. शाळेत बास्केटबॉल खेळताना माझा एका मुलीस हात लागला. तिने मला फॅण्ड्री म्हटले... तिच्यातला तो मनुवाद बोलत होता. मला महिनाभर तिच्या बोलण्याचा मानसिक त्रास झाला. नंतर मी स्वत: ला सावरले. श्रमप्रतिष्ठेला आपल्याकडे महत्त्व नाही. जे स्वच्छता व इतर श्रमाची कामे करतात, त्यांना महत्त्व दिले जात नाही... हा असला अनुभव मी फॅण्ड्री साकारण्यामागे कारणीभूत ठरला आहे.

प्रश्न- आगामी प्रकल्पांबाबत काय?
मंजुळे- एप्रिल महिन्यात आमचा सैराट चित्रपट येत आहे. त्यात चार गाणी आहेत. मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. फॅण्ड्री युवकांना फारसा आवडला नव्हता. कारण त्यात गाणी नव्हती. आणखी चित्रपट क्षेत्रात नवीन नवीन विषय पुढे येत आहेत. त्यात व्यस्त आहे.

प्रश्न- खान्देशात चित्रपट साकारण्याचा मनोदय आहे काय?
मंजुळे- खान्देश हा बहिणाबाई व इतर थोर व्यक्तींचा भाग आहे. संधी मिळाली तर निश्चितच प्रकल्ह हाती घेईल, पण सध्या तरी फारसा वेळ नाही. मी ग्रामीण भागातला असलो तरी शहरात आल्यानंतर मंुबई, पुण्याबाहेर जाणे होत नाही.