शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

मी पद्म पुरस्कार परत करावा का? प्रकाश आमटे यांचा सवाल; हेमलकसातील प्राणी ‘अनाथ’ होण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 05:55 IST

डॉ. प्रकाश आमटे यांचा ज्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ देऊन सन्मान झाला, त्यावरच नोकरशहांची वक्रदृष्टी पडल्याने हेमलकसातील प्राण्यांवर ‘अनाथ’ व्हायची वेळ आली आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली : डॉ. प्रकाश आमटे यांचा ज्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ देऊन सन्मान झाला, त्यावरच नोकरशहांची वक्रदृष्टी पडल्याने हेमलकसातील प्राण्यांवर ‘अनाथ’ व्हायची वेळ आली आहे.डॉ. प्रकाश आमटे व पत्नी डॉ. मंदाकिनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा-भामरागड भागात आदिवासींची सेवा करतात. त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाला आहे. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे येथील लोकांच्या अंगावर कपडे आले, आरोग्य जागृती निर्माण झाली.डॉ. आमटे दाम्पत्याने प्राण्यांचेही पितृत्व स्वीकारले. जखमी प्राण्यांचे अनाथालय उभारले. शंभरावर प्राणी येथे आहेत. परंतु प्राण्यांचे अनाथालय कसे असू शकते, असा प्रश्न वन अधिकाºयांना पडला व प्राण्यांचा सांभाळ बेकायदेशीर असल्याचे कळवले. अनाथालय बंद करा, प्राण्यांना जंगलात सोडा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असा दम भरण्यात आला. वन्यजीव समितीपुढे ते आपले म्हणणे मांडणार आहेत....तर प्राणी मरतील : उपचारासाठी, शिकारीतील मरण टाळण्यासाठी आणलेले प्राणी येथे वाढले. त्यांना शिकार कशी करायची, हे माहीत नाही. जंगलात वावरण्याची सवय नाही. ते १५ ते २० वर्षांचे आहेत. अनाथालय बंद केल्यास प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार? आठवडाभरातच ते मरतील. मला ज्या कार्यासाठी सरकारने पद्म पुरस्कार दिला, त्याविरोधात धोरण आहे. त्यामुळे मला हा पुरस्कार परत करायची भूमिका घ्यावी लागेल. - डॉ. प्रकाश आमटेआमटे कुटुंब देशाचेवैभव आहे. डॉ. प्रकाश आमटे पत्नीसह जंगलात राहिले. त्यांनी प्राण्यांवर प्रेम केले. प्राण्यांसाठीचे नियम कठोर असले तरी परिस्थितीचा विचार व्हायला हवा. -हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र